शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:18 IST

नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देनाशिक : पुणे सेमी हायस्पिड रेल्वे; शेतजमिनी अधिग्रहित होण्याची शेतकऱ्यांना भीती

नायगाव : नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळताच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी मध्य रेल्वेच्या मंजुरीमुळे हा मार्ग होणार हे नक्की मानले जात आहे. त्यामुळे खोºयातील मोह, वडझिरे, ब्राह्मणवाडे, जायगाव, देशवंडी आदी गावांतील ज्या शेतकºयांच्या शेतातून मोजणी झाली आहे, अशा शेतकºयांमध्ये जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे बेभरवशाच्या शेती व्यवसायाला कंटाळलेले शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे, तर अनेक शेतकरी या मार्गातून आपली जमीन वाचविण्यासाठी मार्ग शोधत आहेत.गेल्या २०-२२ वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची वारंवार चर्चा होत होती. या मार्गासाठी नायगाव खोºयातून अनेकदा विविध ठिकाणाहून जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात या मार्गाची अर्थसंकल्पात तरतूद केल्याने हा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सध्या या मार्गाचे काम थोड्याच दिवसात सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक, मोहदरी, सिन्नर, दोडी, चास, देवठाण, संगमनेर, अंबुरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, नारायण गाव, मंचर, भोरवडी, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वाघोली, कोलवडी, मांजरी, हडपसर, पुणे असे या मार्गातील प्रस्तावित थांबे आहे. तसेच नाशिक व पुण्यामधील औद्योगिक क्षेत्रातही थांबे असणार आहे. नायगाव खोºयातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह आदी गावांतून आजपर्यंत अनेकवेळा रेल्वेमार्गाची मोजणी करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे सध्याच्या मंजुरीनंतरही हे काम सुरू होणार का, असा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. अशातच परिसरातील विविध भागातून ही मोजणी झाली असल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे, त्याबाबत शेतकºयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी