शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:57 IST

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसभासदांची मागणी : ऊस लागवड वाढीसाठी गावोगावी बैठका

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस लागवड व एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रातील देहरे, गांडोळे, ननाशी, पिंपळपाडा, वनारे, देवठाण, टिटवे आदी गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ननाशी येथे झालेल्या बैठकीत शेखर देशमुख बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.संचालक मंडळाचे गेल्या अकरा वर्षांचे कामकाज पाहता सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. साखर उद्योग व त्यापुढील अडचणी आपण दररोज प्रसारमाध्यमांमध्ये बघत आहोत. केंद्र सरकारने या उद्योगाला सावरण्यासाठी इथेनॉलचे भाव वाढवून देत इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचे कारखान्यांना सांगितले आहे. त्यासाठी पॅकेजही जाहीर केले आहे, त्याचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे उसाला अजून भाव मिळणार असल्याने कार्यक्षेत्रात निश्चित ऊस लागवड वाढणार आहे. भविष्याचा विचार करता कादवाने आपली गाळप क्षमता वाढवावी व इथेनॉल प्रकल्पाची तयारी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी, कादवाने २५०० मे. टन गाळपाच्या दृष्टीने यापूर्वीच विविध मशिनरी दुरुस्ती करताना त्या क्षमतेच्या केल्या आहेत. आता फक्त बॉयलर, टर्बाइन व मिल बसविणे बाकी आहे, असे सांगितले. यावेळी संचालक विश्वनाथ देशमुख, संपतराव कोंड, रघुनाथ दिघे तसेच दिंडोरी गटातून सातत्याने सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे राजेंद्र देशमुख, भास्कर चौधरी, मुरलीधर कहाणे, सुरेश कदम, सुदाम पवार, सोमनाथ हिंडे, जगन्नाथ नवले, मुरलीधर चौधरी, राजेंद्र ढगे, मच्छिंद्र शिरसाठ उपस्थित होते. ऊस लागवड करण्याची शेतकºयांची ग्वाहीकादवा सहकारी साखर कारखाना उसाला चांगला भाव देत आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. चेअरमन श्रीराम शेटे दरवर्षी गावोगावी बैठका घेऊन ऊस लागवड वाढीसाठी आवाहन करत आहेत. त्यामुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत उत्तम धोरण आखल्याने याचा लाभ शेतकºयांना होणार आहे. कादवाने विस्तारीकरण व इथेनॉलची तयारी करावी. त्यासाठी आम्ही पश्चिम भागातील शेतकरी जास्तीत जास्त व आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करू, अशी ग्वाही देवठाण येथील शेतकरी जगन्नाथ नवले यांनी दिली.