शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:57 IST

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसभासदांची मागणी : ऊस लागवड वाढीसाठी गावोगावी बैठका

दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस लागवड व एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रातील देहरे, गांडोळे, ननाशी, पिंपळपाडा, वनारे, देवठाण, टिटवे आदी गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ननाशी येथे झालेल्या बैठकीत शेखर देशमुख बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.संचालक मंडळाचे गेल्या अकरा वर्षांचे कामकाज पाहता सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. साखर उद्योग व त्यापुढील अडचणी आपण दररोज प्रसारमाध्यमांमध्ये बघत आहोत. केंद्र सरकारने या उद्योगाला सावरण्यासाठी इथेनॉलचे भाव वाढवून देत इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचे कारखान्यांना सांगितले आहे. त्यासाठी पॅकेजही जाहीर केले आहे, त्याचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे उसाला अजून भाव मिळणार असल्याने कार्यक्षेत्रात निश्चित ऊस लागवड वाढणार आहे. भविष्याचा विचार करता कादवाने आपली गाळप क्षमता वाढवावी व इथेनॉल प्रकल्पाची तयारी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी, कादवाने २५०० मे. टन गाळपाच्या दृष्टीने यापूर्वीच विविध मशिनरी दुरुस्ती करताना त्या क्षमतेच्या केल्या आहेत. आता फक्त बॉयलर, टर्बाइन व मिल बसविणे बाकी आहे, असे सांगितले. यावेळी संचालक विश्वनाथ देशमुख, संपतराव कोंड, रघुनाथ दिघे तसेच दिंडोरी गटातून सातत्याने सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे राजेंद्र देशमुख, भास्कर चौधरी, मुरलीधर कहाणे, सुरेश कदम, सुदाम पवार, सोमनाथ हिंडे, जगन्नाथ नवले, मुरलीधर चौधरी, राजेंद्र ढगे, मच्छिंद्र शिरसाठ उपस्थित होते. ऊस लागवड करण्याची शेतकºयांची ग्वाहीकादवा सहकारी साखर कारखाना उसाला चांगला भाव देत आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. चेअरमन श्रीराम शेटे दरवर्षी गावोगावी बैठका घेऊन ऊस लागवड वाढीसाठी आवाहन करत आहेत. त्यामुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत उत्तम धोरण आखल्याने याचा लाभ शेतकºयांना होणार आहे. कादवाने विस्तारीकरण व इथेनॉलची तयारी करावी. त्यासाठी आम्ही पश्चिम भागातील शेतकरी जास्तीत जास्त व आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करू, अशी ग्वाही देवठाण येथील शेतकरी जगन्नाथ नवले यांनी दिली.