शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पावसाचे निमित्तच; इतर वेळीही लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:00 IST

नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.

ठळक मुद्देवीजेचा झटका: तांत्रिक बिघाड झाल्याचे नेहमीचे उत्तर

नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.शुक्रवारी दुपारनंतर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला झाला तर काही भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. सायंकाळनंतर दाटून आलेला काळोख आणि वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील वीज काहीवेळ बंद होती. कमी अधिक प्रमाणात नाशिककरांना खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला असला तरी इतर दिवशीही वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषता: महात्मानगर,सिडकोतील काही भाग, अंबड आणि इंदिरानगर परिसरातील नागरिकांना नेहमीच विस्कळीत वीजेला सामोरे जावे लागते.केवळ याच भागात नव्हे तर शहरातील अन्य भागातील नागरिकांना देखील असाच अनुभव येत आहे. उपनगर परिसरात तर मध्यरात्री केंव्हाही वीजपुरवठा गायब होतो. काही फेज बंद तर कही सुरू राहत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली तर काम सुरू असल्याचे किंवा थोड्यावेळेत वीज येईल अशी उत्तरे मिळतात. परंतु कुठे बिघाड झाला आणि नेमके काय घडले याबाबत माहितीच दिली जात नाही.सिडको-अंबड परीसर तसेच सातपूरच्या काही भागालाही हीच समस्या भेडसावत आहे. पंचवटीतील हिरावाडी परिसर, दिंडोरी रोड परिसरातीही खंडीत वीजपुरवठ्याचा नागरिकांना अनुभव येत आहे. पावसाळा परतीच्या मार्गावर असतांनाही शुक्रवारी झालेल्या पावसात नागरिकांना पावसाळ्यातील खंडीत वीजपुरवठ्याचा अनुभव आला.नागरिकांशी तुटला संपर्कवीजबील भरणा,मीटर रिडींग तसेच तक्रारी करण्याºया यंत्रणेचे खासगीकरण झाल्याने नागरिकांचा आणि स्थानिक अभियंत्यांचा फारसा संपर्क राहिला नाही. लाईनमनचा क्रमांक नागरिकांकडे सापडतोही परंतु अधिकारी आणि अभियंत्यांचा भ्रमणध्वनी मिळविण्यासाठी धडपड करावी लागते.

 

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज