शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:39 IST

शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. येथील परशुराम साईखेडकर सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कुलकर्णी पुढे म्हणाले, पाण्याचे महत्त्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले तरच ते शक्य आहे. जलतज्ज्ञ सुरेश कुटे यांनी पाणी हा जीवनशैलीचा भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादित न राहता याविषयी निरंतर प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी प्रास्ताविकात जलजागृती सप्ताहानिमित्त आयो जित उपक्रमांची माहिती दिली.  गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी ‘पाण्याला लागली तहान’ हे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘पाणी वाढ गं माय’ ही कविता सादर केली. कार्यक्रमास महापालिकेचे शहर अभियंता ए. व्ही. धनाईत, कार्यकारी अभियंता प्रवीण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीश सौंदाणी आदी उपस्थित होते. जल दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह ‘व्यथा’ या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी, आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्त्व मांडण्यात आले. तृप्ती बोरसे हिचे ‘पाणीप्रश्न आणि मी’ या विषयावर व्याख्यान झाले.

टॅग्स :Waterपाणी