शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:39 IST

शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. येथील परशुराम साईखेडकर सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कुलकर्णी पुढे म्हणाले, पाण्याचे महत्त्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले तरच ते शक्य आहे. जलतज्ज्ञ सुरेश कुटे यांनी पाणी हा जीवनशैलीचा भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादित न राहता याविषयी निरंतर प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी प्रास्ताविकात जलजागृती सप्ताहानिमित्त आयो जित उपक्रमांची माहिती दिली.  गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी ‘पाण्याला लागली तहान’ हे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘पाणी वाढ गं माय’ ही कविता सादर केली. कार्यक्रमास महापालिकेचे शहर अभियंता ए. व्ही. धनाईत, कार्यकारी अभियंता प्रवीण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीश सौंदाणी आदी उपस्थित होते. जल दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह ‘व्यथा’ या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी, आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्त्व मांडण्यात आले. तृप्ती बोरसे हिचे ‘पाणीप्रश्न आणि मी’ या विषयावर व्याख्यान झाले.

टॅग्स :Waterपाणी