शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

ग्रामीण भागातून रसाचा लाकडी घाणा कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:03 IST

तुकाराम रोकडे देवगांव : पूर्वी बैलांच्या व मानवाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेत होता. ...

ठळक मुद्देयंत्राने घेतली जागा : चव बदलली

तुकाराम रोकडेदेवगांव : पूर्वी बैलांच्या व मानवाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेत होता. आज ग्रामीण बाजारपेठेतून लाकडी घाणे लुप्त होत असून यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या ऊसाच्या रसाची चव देखील बदलली आहे.लाकडी घाण्यातील रस अतिशय शुद्ध चवदार असायचा. मात्र, यांत्रिक युगात मानवी व लाकडी घाण्याची जागा आता यंत्राने घेतली आहे.आता तर यंत्राच्या सहाय्याने काढलेला रस गल्लीबोळात पोहोचलेला आहे. मात्र, मानवी व लाकडी घाण्यावरून रसाचा स्वाद हा रस देऊ शकला नाही. त्यामुळे गरिबांच्या शीतपेयांची ती जुनी चव इतिहासजमा होत असल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखला जाणारा ऊसाचा रस बहुराष्ट्रीय शीतपेयांच्या आगमनाने मागे पडलेला दिसतो. विद्युत यंत्राच्या सहाय्याने लोखंडी यंत्रातून निघणाऱ्या ऊसाच्या रसापेक्षा लाकडाच्या घाण्यातून निघणारा ऊसाचा रस अधिक चवदार असल्याच्या प्रतिक्रिया आजही ग्रामीण भागात उमटतात. शहरी भाग व तालुक्यांच्या ठिकाणी प्रखर उन्हाळ्याच्या मोसमात रसवंत्या थाटल्या जातात. या सर्व रसवंत्यांमध्ये विद्युत मोटारीवर चालणाऱ्या लोखंडी यंत्रावरून ऊसाचा रस काढण्यात येतो.अतिशय कमी जागेत हे यंत्र बसविले जात असल्याने व्यावसायिकाला ते सोयीचे होत असते. या रसात बर्फ टाकल्याने ग्राहकांना थंड रस मिळतो. त्यात लिंबाचा समावेश असल्याने रसाच्या चवीत अधिक भर पडते. या रसाचे चलन शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असते. थंड शीतपेयाच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.पूर्वी बैलांच्या किंवा मानवाच्या सहाय्याने लाकडी घाण्यातून निघणाऱ्या रसापासून ग्राहकांना जे समाधान मिळत होते ते समाधान यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या ऊसाच्या रसातून मिळत नसले तरी आर्थिकदृष्ट्या तो परवडणारा असल्याचे सांगितले जाते. आता बैलांच्या किंमती वाढल्याने व बैल हाकणाऱ्या माणसाला मजुरी द्यावी लागत असल्यामुळे यातून सुटका मिळविण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. ते यंत्र शहरातील ग्रामीण बाजारपेठेत गल्ली बोळात फिरवताना रसविक्रेते दिसून येतात.सध्या काळाच्या ओघात लाकडी घाणा लुप्त होताना दिसत आहे. पूर्वी या घाण्यावर खुळखुळ्याचा वापर होत असायचा, यामुळे ग्राहकांना हे खुळखुळे आकर्षित करून ऊसाच्या रसाकडे येण्यास भाग पाडायचे. उन्हाळ्यात या ऊसाला प्रचंड प्रमाणात मागणी होत असायची. मात्र, आज वेगवेगळी शीतपेये बाजारात उपलब्ध होत असल्याने ऊसाच्या रसाची मागणी मागे पडू लागली आहे. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलbusinessव्यवसाय