शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पिळकोसला बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:20 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देपशुधनाचा फडशा : शेतकऱ्यांमध्ये घबराटतातडीने पिंजरा बसविण्याची मागणी

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे.आताही वसंत गणपत जाधव यांच्या शेळ्या व बोकड बिबट्या व मादीने फस्त केले. बिबट्या सतत याच शेतकºयांच्या पशुधनाचा फडशा पाडत असून, एकाच शेतकºयाचे पशुधन बिबट्याला बळी ठरत असून, हे बिबटे चार वर्षांपासून वनविभागाच्या हाती लागत नसून या बिबट्या व मादीपासून डोंगराच्या पायथ्यालगत शेती करणारे व वास्तव्य करणाºया शेतकºयांचे पशुधन नष्ट होत असून, शेतकरी बिबट्याच्या या धुमाकुळीने हताश झाले असून वनविभागाने बिबट्याला व मादीला जेरबंद करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून होत आहे. वनरक्षक एस. टी. आहिरे यांनी मृत शेळी व बोकड यांचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस.आहेर यांनी शवविच्छेदन करून अहवाल पाठविला आहे.ज्या ठिकाणी कळवण वनविभागाची हद्द समाप्त होते आणि ज्या ठिकाणापासून देवळा वनविभागाची हद्द सुरू होते ते ठिकाण म्हणजे मेंगदर डोंगर. मेंगदर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गप्रेमी शेतकºयांनी तब्बल वीस वर्षांपासून कुºहाडबंदी करून वीस वर्षांत जंगल राखण करून दाट जंगल तयार केले आहे, परंतु याच दाट जंगलातआता वन्यप्राण्यांचे अस्तित्व वाढू लागल्याने या मेंगदर जंगलात सर्वाधिक मोर, ससे, पोपट, माकड, कोल्हे, लांडगे व आता बिबटे-मादीचे वास्तव्य वाढले आहे.मोर, ससे, पोपट माकडे यांनी जरी जंगलाच्या सौंदर्यात वाढ झाली असली तरी, ज्या शेतकºयांनी जंगलाचे रक्षण केले आज त्याच शेतकºयांना या घनदाट जंगलाची भीती वाटू लागली असल्याचे शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मेंगदर डोंगराच्या पायथ्याला वास्तव्य करून शेती करणाºया शेतकºयांना व त्यांच्याकडील पशुधनाला आज वीस वर्षांनंतर धोका जाणवू लागला असून, मागील वर्षीही मेंगदर डोंगराच्या जंगलात बिबट्या व मादीने दोन महिने वास्तव्य केले. त्यावेळेस बिबट्याने जंगलात शेळ्या चारण्यास गेलेल्या दोन आदिवासी बांधवांनाही जखमी करून मोठ्या प्रमाणावर पशुधनाचा फडशा पाडला होता.देवळा वनविभागाने मेंगदर परिसर बिबट्याच्या जाचातून त्वरित मोकळा करावा, अशी मागणी उत्तम मोरे, गटलू जाधव,अभिमन्यू वाघ, केवळ वाघ, बुधा जाधव, मार्कंड जाधव, राहुल सूर्यवंशी यांसह निसर्गप्रेमी, ग्रामस्थ, पशुपालक, शेतमजूर यांनी केली आहे.देवळा वनविभागाने बिबट्या व मादीस जेरबंद करण्यासाठीतत्काळ पिंजरा लावला होता परंतु बिबट्या व मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात देवळा वनविभागाला अपयश आले होते. दोन महिने पिंजरा लावण्यात आला होता. पिंजºयात सावजही ठेवण्यात आले होते व त्यावेळेस वेळोवेळी पिंजºयाच्या जागाही बदलविण्यात आल्या होत्या, तरीही त्यावेळेस बिबट्या व मादीला देवळा वनविभागाला जेरबंद करता आले नाही. त्यावेळेस बिबट्या व मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जो पिंजरा लावला होता तो आजही त्याच मेंगदर डोंगरावर पडून असून, आता तरी बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पशुपालक व शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या