शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी भरले; नाशिककर तरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:25 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे.

नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाचे चटके सहन करत आला आहे. मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण हे बव्हंशी नाशिकमधील गंगापूर धरण समूहावर अवलंबून आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा अत्यल्प असला, की गंगापूर धरण समूहासह नगर जिल्ह्यातील मुळा प्रकल्पातील पाण्याकडे लक्ष केंद्रित होते. जायकवाडीला पाण्याच्या आवर्तनावरून आजवर नगरसह नाशिकमध्ये वाद उद्भवले आहेत. सन २०१५ मध्ये गंगापूर धरणासह मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये पाण्याचा जेमतेम साठा शिल्लक असताना समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा पुढे करून महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची कृती करण्यात आली होती.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पाणी आवर्तनासाठी आंदोलन करीत असताना त्यांना डावलून दुसरीकडे मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यातूनच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय व राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनातही प्रचंड गाजले होते. मागील वर्षी, सन २०१६ मध्ये राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही ९३ टक्क्याच्या आसपास भरले होते. त्यावेळी जायकवाडी धरणात ८८.७८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याने महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार धरणात ६५ टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला होता. त्यानुसार, मागील वर्षी गंगापूर धरणसमूहातील जलसाठा टिकून राहिला परिणामी, नाशिककरांना पाणीटंचाईची धग जाणवली नाही.  यावर्षी तर वरुणराजाची कृपावृष्टी झाली आणि राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहताना दिसून येत आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठाही ९८ टक्क्यांहून अधिक झाल्याने नऊ वर्षांत प्रथमच धरणातील १८ दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गंगापूर धरणातील मुबलक पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर नाशिककरांना करता येणार आहे. गंगापूर धरण समूहासह जायकवाडी धरणही भरल्याने किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिक-नगर-मराठवाडा वादाला तिलांजली मिळाली आहे.जायकवाडीला सुमारे ६० टीएमसी पाणीनाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून यंदा जायकवाडीला सुमारे ६० टीएमसीपेक्षाही अधिक पाणी जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे नऊ वर्षांनंतर प्रथमच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे हे अर्ध्या फुटाने उघडून सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. जायकवाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी जाऊन पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सहा वेळा पूर आलेला आहे. याशिवाय, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने अनेकदा विसर्ग करण्यात आलेला आहे.