शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम

By admin | Updated: December 9, 2014 01:26 IST

जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम

  नाशिक : येत्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्'ात पाण्याची पातळी खोल गेलेल्या जवळपास ७० गावांमध्ये विविध उपक्रम राबवून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना केल्या. जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१६ असा सलग वर्षभर विविध कार्यक्रम राबवून मार्च २०१६ मध्ये त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन ते तीन मीटरपेक्षा अधिक खोलवर गेलेली भूजल पातळी व गेल्या तीन वर्षांत सलग टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात साखळी बंधारे, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून, रोजगार हमी योजनेत ज्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता असेल त्याठिकाणी रोहयोच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली व टंचाईमुक्त महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी गावांचा शोध व कामे सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.