शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:44 IST

राजापूर : परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून त्यानिमित्ताने जागरण गोंधळाच्या कार्यक्र मांचा जारेदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.

खंडोबा व देवीचा जागरण गोंधळाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे .सध्या नवीन लग्न झालेले जोडपे जेजुरीला देवदर्शन करून घरी आल्यावर कुलदैवत श्री जेजुरीचा खंडोबा व आई तुळजा भवानी यांचा जागरण गोंधळ घातला जातो. घरात सुख शांती नांदावी व संसारात अडचणी येऊ नये म्हणून जागरण व गोंधळ आयोजित केला जातो. सध्या राजापूर व परिसरात दररोज कुठे ना कुठे जागरण गोंधळ असतो. यात दिवट्या- बुधल्याच्या साहाय्याने रात्रभर देवाच्या नावाने दिवटीवर तेल जाळले जाते.रात्रभर वाघेमंडळी खंडोबा व देवीचे गीते तसेच पारंपरिक खंडोबा व म्हाळसाचीभांडण कथा आणि बानुबाईला देव जेजुरीला कसे आणतात हे कथेतून वाघेमंडळीआजही कथेतून सादर करतात. यामध्ये मुरळी मिराताई कावळे औरंगाबादकर यांनी आपल्या गीतांतून ‘चिमण्ये माझे माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला परक्या घरी’ या गाण्यामधून मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा ,मुलगी शिकवा, देश वाचवा असा संदेश दिला. शिवमल्हार वाघे मंडळाने आजही गीतांची लोकप्रियता जपली आहे . तसेच आरधीन देवीचे गीत गाताना व डोक्यावर समई तसेच समईवर पाण्याने भरलेली घागर घेऊन सुंदर कला सादर केली. या जागरण कार्यक्रमात मिराताई कावळे यांनी किती नशीब थोर माझे, याने मला मुरळी बनवलं, अंबा खेळत आली या तसेच पोवाडा आा विविध कार्यक्रमातून उपस्थितांची करमणूक केली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान खंडोबा देवाचा लंगर तोडण्यात आला व घटाचे ओझे उतरवून कार्यक्र माची सांगता झाली.कोट...ग्रामीण भागात आमच्या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद मिळतो. वयाच्या सहा वर्षांपासून आई- वडिलांनी मला नवसाने सोडलेली मुरळी म्हणून मला ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात कार्यक्रम सुरु आहेत. आतापर्यंत अनेक कथा व गाण्यांच्या खजिना जनते पर्यंत पोहचवता आला, याचे समाधान वाटते.- मिराताई चंद्रकात कावळे ,मुरळी, औरंगाबादकर

टॅग्स :Socialसामाजिक