शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:44 IST

राजापूर : परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून त्यानिमित्ताने जागरण गोंधळाच्या कार्यक्र मांचा जारेदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.

खंडोबा व देवीचा जागरण गोंधळाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे .सध्या नवीन लग्न झालेले जोडपे जेजुरीला देवदर्शन करून घरी आल्यावर कुलदैवत श्री जेजुरीचा खंडोबा व आई तुळजा भवानी यांचा जागरण गोंधळ घातला जातो. घरात सुख शांती नांदावी व संसारात अडचणी येऊ नये म्हणून जागरण व गोंधळ आयोजित केला जातो. सध्या राजापूर व परिसरात दररोज कुठे ना कुठे जागरण गोंधळ असतो. यात दिवट्या- बुधल्याच्या साहाय्याने रात्रभर देवाच्या नावाने दिवटीवर तेल जाळले जाते.रात्रभर वाघेमंडळी खंडोबा व देवीचे गीते तसेच पारंपरिक खंडोबा व म्हाळसाचीभांडण कथा आणि बानुबाईला देव जेजुरीला कसे आणतात हे कथेतून वाघेमंडळीआजही कथेतून सादर करतात. यामध्ये मुरळी मिराताई कावळे औरंगाबादकर यांनी आपल्या गीतांतून ‘चिमण्ये माझे माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला परक्या घरी’ या गाण्यामधून मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा ,मुलगी शिकवा, देश वाचवा असा संदेश दिला. शिवमल्हार वाघे मंडळाने आजही गीतांची लोकप्रियता जपली आहे . तसेच आरधीन देवीचे गीत गाताना व डोक्यावर समई तसेच समईवर पाण्याने भरलेली घागर घेऊन सुंदर कला सादर केली. या जागरण कार्यक्रमात मिराताई कावळे यांनी किती नशीब थोर माझे, याने मला मुरळी बनवलं, अंबा खेळत आली या तसेच पोवाडा आा विविध कार्यक्रमातून उपस्थितांची करमणूक केली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान खंडोबा देवाचा लंगर तोडण्यात आला व घटाचे ओझे उतरवून कार्यक्र माची सांगता झाली.कोट...ग्रामीण भागात आमच्या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद मिळतो. वयाच्या सहा वर्षांपासून आई- वडिलांनी मला नवसाने सोडलेली मुरळी म्हणून मला ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात कार्यक्रम सुरु आहेत. आतापर्यंत अनेक कथा व गाण्यांच्या खजिना जनते पर्यंत पोहचवता आला, याचे समाधान वाटते.- मिराताई चंद्रकात कावळे ,मुरळी, औरंगाबादकर

टॅग्स :Socialसामाजिक