शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:44 IST

राजापूर : परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून त्यानिमित्ताने जागरण गोंधळाच्या कार्यक्र मांचा जारेदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.

खंडोबा व देवीचा जागरण गोंधळाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे .सध्या नवीन लग्न झालेले जोडपे जेजुरीला देवदर्शन करून घरी आल्यावर कुलदैवत श्री जेजुरीचा खंडोबा व आई तुळजा भवानी यांचा जागरण गोंधळ घातला जातो. घरात सुख शांती नांदावी व संसारात अडचणी येऊ नये म्हणून जागरण व गोंधळ आयोजित केला जातो. सध्या राजापूर व परिसरात दररोज कुठे ना कुठे जागरण गोंधळ असतो. यात दिवट्या- बुधल्याच्या साहाय्याने रात्रभर देवाच्या नावाने दिवटीवर तेल जाळले जाते.रात्रभर वाघेमंडळी खंडोबा व देवीचे गीते तसेच पारंपरिक खंडोबा व म्हाळसाचीभांडण कथा आणि बानुबाईला देव जेजुरीला कसे आणतात हे कथेतून वाघेमंडळीआजही कथेतून सादर करतात. यामध्ये मुरळी मिराताई कावळे औरंगाबादकर यांनी आपल्या गीतांतून ‘चिमण्ये माझे माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला परक्या घरी’ या गाण्यामधून मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा ,मुलगी शिकवा, देश वाचवा असा संदेश दिला. शिवमल्हार वाघे मंडळाने आजही गीतांची लोकप्रियता जपली आहे . तसेच आरधीन देवीचे गीत गाताना व डोक्यावर समई तसेच समईवर पाण्याने भरलेली घागर घेऊन सुंदर कला सादर केली. या जागरण कार्यक्रमात मिराताई कावळे यांनी किती नशीब थोर माझे, याने मला मुरळी बनवलं, अंबा खेळत आली या तसेच पोवाडा आा विविध कार्यक्रमातून उपस्थितांची करमणूक केली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान खंडोबा देवाचा लंगर तोडण्यात आला व घटाचे ओझे उतरवून कार्यक्र माची सांगता झाली.कोट...ग्रामीण भागात आमच्या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद मिळतो. वयाच्या सहा वर्षांपासून आई- वडिलांनी मला नवसाने सोडलेली मुरळी म्हणून मला ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात कार्यक्रम सुरु आहेत. आतापर्यंत अनेक कथा व गाण्यांच्या खजिना जनते पर्यंत पोहचवता आला, याचे समाधान वाटते.- मिराताई चंद्रकात कावळे ,मुरळी, औरंगाबादकर

टॅग्स :Socialसामाजिक