शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनता दल अस्तित्वहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:08 IST

नाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस्तित्व नष्ट झाले आहे. बदललेली राजकीय समीकरणे व पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळणाºया नेतृत्वाअभावी या पक्षावर मालेगाव मतदारसंघात यंदा एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षांचा बालेकिल्ला संपुष्टात । एमआयएमला समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस्तित्व नष्ट झाले आहे. बदललेली राजकीय समीकरणे व पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळणाºया नेतृत्वाअभावी या पक्षावर मालेगाव मतदारसंघात यंदा एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.राष्टÑीय जनता दलाच्या निर्मितीपूर्वीपासूनच मालेगाव मतदार संघाने पुरोगामी विचारांना साथ दिली. संयुक्त महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांनी पहिल्यांदाच मालेगाव मतदारसंघावर जनता दलाचा झेंडा फडकविला. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी हा बालेकिल्ला अधिक भक्कम केला. एवढेच नव्हे तर तत्कालीन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जनता दलातून थेट संसदेत खासदार पाठविण्यातही मालेगावने वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यात नाशिक जिल्ह्यात व त्यातल्या त्यात मालेगाव मतदारसंघात जनता दलाने आपला गड शाबूत ठेवल्यामुळे जॉर्ज फर्नांडिस, एच. डी. देवगौडा, शरद यादव यांसारख्या राष्टÑीयस्तरावरील नेत्यांनी देखील वेळोवेळी पाठराखण केली. स्व. निहाल अहमद यांचा विधिमंडळातील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता विरोधी पक्षांच्या वतीने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सोपविली होती. १९९८ मध्ये केंद्रातील अल्पमतातील अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पराभूत झाल्यानंतर देशपातळीवरील राजकीय घडामोडीत राष्टÑीय जनता दलाची शकले उडाली व त्यातून जनता दल सेक्युलर या नवीन पक्षाची स्थापना झाली. नाशिक जिल्ह्याने जनता दल सेक्युलरच्या बाजूने कौल दिला. याच काळात जनता दलाचे राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्व. निहाल यांना प्रदेशाध्यक्षाच्या रूपाने मिळाली. २००४ मध्ये मालेगाव मतदार संघाने परिवर्तन घडविले व जनता दलाची मक्तेदारी संपुष्टात आणली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांच्यानंतर त्यांच्या पुत्राने मालेगाव मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला नाकारले मात्र जनता दलाला दुसºया क्रमांकाची मते मिळाली. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल यांचा वारसा चालविण्यास कोणीही पुढे न आल्याने जनता दलाला एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019