शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जालियनवाला हत्याकांड सर्वाधिक क्रू र कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:18 IST

भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देअंजली वेखंडे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.जालियनवाला बाग हत्याकांडास १३ एप्रिल २०१९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्याने इतिहासातील या काळ्याकुट्ट दिनाच्या स्मरणार्थ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास संकलन समितीच्या सहकार्यवाह डॉ. अंजली वेखंडे यांच्या ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ या विषयावर जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात त्यांनी घटनेतील सर्व तपशील सांगितले.याप्रसंगी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, विलास पूरकर, प्रदीप कुलकर्णी, इतिहास संकलन समितीचे कार्यवाह पंड्या, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, संजय सूर्यवंशी, लता अंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. आजकाल मुले इतिहास विसरत चालली आहेत, त्यांना इतिहासाची माहिती व्हावी म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याता प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.जालियनवाला बाग हत्याकांडानंतर संपूर्ण भारतभर इंग्रजांविरु द्ध असंतोष निर्माण झाला. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सत्याग्रह उभे राहिले. त्यानंतर सर्व भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध देशभरात सत्याग्रह केले.महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यानंतर देशभरात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती, असेही डॉ. वेखंडे यांनी सांगून इतिहासातील मागोवा घेतला.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास