जळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:21 PM2019-12-27T15:21:18+5:302019-12-27T15:21:49+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची आवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप,जऊळके ते देशमाने या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालीआहे .

 Jalgaon Neur - It was difficult to travel on the highways. | जळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड.

जऊळके ते मुखेड फाटा रस्त्याची झालेली दुरवस्था 

Next
ठळक मुद्देया परिसरातील नागरिक, शेतकरीयांनीसंतापव्यक्तकेला आहे. या रस्त्यावरु न दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. रस्त्यांवर मोठ-मोठे पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांनामोठी कसरत करावी लागते.


या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांची जास्त हाल होत आहेत, आता पुढे लग्न सराईचे दिवस असल्यामुळे टायर फुटणे, टायर पंक्चर होणे, असे प्रकार घडत आहेत, मुखेड फाटा ते जऊळके रस्त्याची ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मुरु म टाकून डागडुजी केली होती, परंतु आता परत रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे.लोकवर्गणीतून काढून किती दिवस रस्ता दुरु स्त करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरु न शेकडो वाहन धारक प्रवास करतात परंतु रस्त्याची आवस्था खराब झाल्याने वाहन धारकांना विंचूर मार्गे प्रवास लागत आहे. खराब रस्त्यामुळे पाठीचे व मनक्याचे आजार जडत असून अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी.अशीमागणीहोतआहे.
*******

मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्यावरून पिक अप , रिक्षा जात नसल्यामुळे शेतकº्यांना आपला माल ट्रॅक्टरने किंवा मोठ्या वाहनाने बाजारात न्यावा लागत असल्याने रस्ता दुरु स्ती केव्हा होणार हा वाहन चालकांना व शेतकर्यांना पडलेला प्रश्न आहे.

--
चारीचा आधार पण अपघाताला निमंत्रण

जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्याच्या कडेला चारी आहे ,खराब रस्त्यामुळे या चारीवरु न प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने चारीचा आधार मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन रंगनाथ गवंडी या शेतकº्यांचे अपघात होऊन तीन बोटे तुटल्याने अपंगत्व आले आहे.

प्रतिक्रि या ...
येवल्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या बरेचशा रस्त्यांचे डांबर निघाल्याने खडीकरणासारखे खड्डेमय रस्ते झाले असुन रस्त्याने प्रवास करतांना मोठी कसरत करावी लागते.गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची रस्त्यांची डागडुजी झालेली नाही खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघात देखील झालेआहेत. जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्यावरु न दोनशे विद्यार्थी ये जा करतात, तेव्हा शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन दूरु स्ती करावी.-
दिनकर शिंदे.जळगाव नेऊर

फोटो..

Web Title:  Jalgaon Neur - It was difficult to travel on the highways.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.