शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

जाखोरीकरांनी भागवली चिखलवाडीची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:20 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.  जाखोरी येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक उपक्रम राबविले जातात. वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देवीदास राजपूत, संदीप बनकर, अमोल मगर, विश्वास कळमकर, सरपंच सुनीताताई कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी वाचनालयाच्या या पदाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील लहान-मोठ्या पाड्यांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावेळी पहिने गावाच्या परिसरातील चिखलवाडी येथील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. या महिलांची पायपीट थांबावी म्हणून विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून चिखलवाडी पाड्यावर पिण्याचे पाणी साठविण्यासाठी एक हजार लिटरची टाकी बसविण्यात आली. चिखलवाडी पाड्यापासून लांबवर असलेल्या विहिरीवर जलपरी बसवून, पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकून टाकीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.  जाखोरीच्या विचारक्रांती वाचनालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे पहिने गावचे सरपंच काशीनाथ डगळे, किसन वारघडे, साळू वारघडे, हिरामण खांडवी, संगीता बाजाड, नारायण धनगर आदींनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ