शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जाखोरीकरांनी भागवली चिखलवाडीची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:20 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.  जाखोरी येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक उपक्रम राबविले जातात. वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देवीदास राजपूत, संदीप बनकर, अमोल मगर, विश्वास कळमकर, सरपंच सुनीताताई कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी वाचनालयाच्या या पदाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील लहान-मोठ्या पाड्यांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावेळी पहिने गावाच्या परिसरातील चिखलवाडी येथील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. या महिलांची पायपीट थांबावी म्हणून विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून चिखलवाडी पाड्यावर पिण्याचे पाणी साठविण्यासाठी एक हजार लिटरची टाकी बसविण्यात आली. चिखलवाडी पाड्यापासून लांबवर असलेल्या विहिरीवर जलपरी बसवून, पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकून टाकीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.  जाखोरीच्या विचारक्रांती वाचनालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे पहिने गावचे सरपंच काशीनाथ डगळे, किसन वारघडे, साळू वारघडे, हिरामण खांडवी, संगीता बाजाड, नारायण धनगर आदींनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ