शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जाखोरी, नागोसली ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा सार्वजनिक सेवांच्या सुधारण्यासाठी त्याचबरोबर पंचायतराज संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिला जातो. या ...

पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा सार्वजनिक सेवांच्या सुधारण्यासाठी त्याचबरोबर पंचायतराज संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत असे असते.

नाशिक जिल्ह्यातील १३८५ ग्रामपंचायतींनी नामांकनात सहभाग नोंदवल्यानंतर अंतिम दहा ग्रामपंचायतीतून जाखोरी व नागोसली या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. हा पुरस्कार मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात यंदाच्या वर्षीदेखील मानाचा तुरा रोवला आहे. जाखोरी गावात सरपंच मंगला युवराज जगळे व ग्रामसेवक उत्कर्ष पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेत रानमळ्यातील गाळ काढत नाल्यांची आणि बंधाऱ्यांची स्वच्छता केली. यामुळे पाणी अडवले जाऊन शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. यासह गावातील युवकांना वाचनालय, गावकऱ्यांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आपले सरकार ई-सेवा केंद्राद्वारे गावकऱ्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत नोंदणी या विविध आघाड्यांवर काम केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील नागोसली हे गाव शहराच्या मुख्यालयापासून ४५ किमीवर अतिदुर्गम ठिकाणी आहे. या गावात काही वर्षांपूर्वी मूलभूत सोयी सुविधा या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. परंतु आता गावातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीएसआर फंडातून शाळेची इमारत बांधण्यात आली. गावातील लोकांच्या सोयीसाठी आपले सरकार ई- सेवा केंद्र सुरू करण्यात आले .यामध्ये गावातील सरपंच आशा तुकाराम गिऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांची मोलाची मदत लाभल्याचे ग्रामसेवक एस. पी. मार्कंडे यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा परिषदेत आयटी कक्षात जाखोरी व नागोसली गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून या पुरस्काराचा स्वीकार केला, यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी हे उपस्थित होते.

(फोटो २६ झेडपी)