शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

जैन अलर्ट ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांना दैनंदिन वस्तंूचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:32 IST

अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले

नाशिक : अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.आचार्य श्री हेमरत्नसुरीवरजी यांच्या मार्गदर्शनासाठी जैन अलर्ट ग्रुपच्या देशभरातील शाखांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असे उपक्रम राबविताना समाजातील वंचित घटकांना मदत दिली जाते. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गाव आणि वाड्यांत पाणी नाही. हाताला रोजगार नाही. अनेक ठिकाणी तर रोजगार आणि पाण्यासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागत आहे. धुळे आणि चाळीसगावच्या दरम्यानदेखील सुमारे एक हजार कुटुंबांना अशाच प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले. सरसंचालक राजन पारीख, अभिजित शहा, धर्मेश बारोट, पलक मेहता, दिनेश जोशी, जीन शहा यांच्यासह अनय पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे या पाड्यांवरील नागरिकांना मद्य व मांसाहार वर्ज्य करण्याचे आवाहन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंचा समावेशपेठ- हरसूलजवळील मानकापूर, गावंद, शिंगदरी, चिऱ्यांचा पाडा, डोंगरशेत तसेच रायतळे या भागात तर दोन वेळेसच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या मुंबईच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील आदिवासी पाड्यांना अडीचशे दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक