शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जैन अलर्ट ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांना दैनंदिन वस्तंूचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:32 IST

अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले

नाशिक : अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.आचार्य श्री हेमरत्नसुरीवरजी यांच्या मार्गदर्शनासाठी जैन अलर्ट ग्रुपच्या देशभरातील शाखांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असे उपक्रम राबविताना समाजातील वंचित घटकांना मदत दिली जाते. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गाव आणि वाड्यांत पाणी नाही. हाताला रोजगार नाही. अनेक ठिकाणी तर रोजगार आणि पाण्यासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागत आहे. धुळे आणि चाळीसगावच्या दरम्यानदेखील सुमारे एक हजार कुटुंबांना अशाच प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले. सरसंचालक राजन पारीख, अभिजित शहा, धर्मेश बारोट, पलक मेहता, दिनेश जोशी, जीन शहा यांच्यासह अनय पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे या पाड्यांवरील नागरिकांना मद्य व मांसाहार वर्ज्य करण्याचे आवाहन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंचा समावेशपेठ- हरसूलजवळील मानकापूर, गावंद, शिंगदरी, चिऱ्यांचा पाडा, डोंगरशेत तसेच रायतळे या भागात तर दोन वेळेसच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या मुंबईच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील आदिवासी पाड्यांना अडीचशे दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक