शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

एकलहरे रोडवर महिनाभरापासून अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:28 IST

येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.येथील एकलहरे वीज केंद्रापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंत महानिर्मिती कंपनीने पथदीपांची व्यवस्था केलेली आहे. किर्लोस्कर टेकडीपासून पुढे सिन्नर फाट्यापर्यंत महानगरपालिकेने पथदीप बसविले आहेत. मात्र हे पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने किर्लोस्कर टेकडी ते गवळीबाबा मंदिरापर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीचा कारखाना आहे. तेथे चौकीदार रात्रं-दिवस पहारा देत असल्याने कंपनीच्या आतल्या भागात दिवे आहेत. मात्र मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अंधार असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रेल्वे ट्रॅक्शनच्या पुढे गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतचा हा रस्ता आधीच निर्जन आहे.अंधाराचा गैरफायदा घेऊन या रस्त्यावर अनेक गैरप्रकार व लुटमारीचे प्रसंगही घडले आहेत.सायंकाळनंतर या रस्त्यावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढतो. अनेकदा गैरप्रकारही नागरिकांनी पाहिले आहेत. अंधाराचा फायदा घेत अनेकदा या रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणून टाकली जातात. रस्त्याच्या कडेला धनदाट झाडी असल्याने सापांचे प्रमाणही वाढले आहे. रात्री-बेरात्री वाहनधारकांना सापांचे दर्शन झाले आहे. गेल्याच आठवड्यात किर्लोस्कर कंपनीच्या चौकीदाराला बिबट्याचे रात्री साडेआठच्या सुमारास दर्शन झाले. त्याचवेळी एकलहरेकडे जाणाऱ्या रिक्षावाल्यालाही बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे रिक्षा पुढे नेण्यास त्याने हिंमत केली नाही. बिबट्या किर्लोस्कर टेकडीच्या जंगलात दिसेनासा झाल्यावर रिक्षा पुढे नेली.वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणीया रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत अनेकदा छोट्या-मोठ्या रस्ता लुटीच्या व चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी जोरदार पावसाने विजेच्या तारांवर झाड उन्मळून पडल्याने तारा तुटून लोंबकळत होत्या. तेव्हापासून सुमारे महिना-दीड महिन्याच्या कालावधीत कोणीही दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही, असे नागरिक सांगतात.महानगरपालिका विद्युत विभागाने एकलहरे रस्त्यावरील गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतच्या तुटलेल्या विजेच्या तारा दुरु स्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :electricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका