शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे रोडवर महिनाभरापासून अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:28 IST

येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.येथील एकलहरे वीज केंद्रापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंत महानिर्मिती कंपनीने पथदीपांची व्यवस्था केलेली आहे. किर्लोस्कर टेकडीपासून पुढे सिन्नर फाट्यापर्यंत महानगरपालिकेने पथदीप बसविले आहेत. मात्र हे पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने किर्लोस्कर टेकडी ते गवळीबाबा मंदिरापर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीचा कारखाना आहे. तेथे चौकीदार रात्रं-दिवस पहारा देत असल्याने कंपनीच्या आतल्या भागात दिवे आहेत. मात्र मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अंधार असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रेल्वे ट्रॅक्शनच्या पुढे गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतचा हा रस्ता आधीच निर्जन आहे.अंधाराचा गैरफायदा घेऊन या रस्त्यावर अनेक गैरप्रकार व लुटमारीचे प्रसंगही घडले आहेत.सायंकाळनंतर या रस्त्यावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढतो. अनेकदा गैरप्रकारही नागरिकांनी पाहिले आहेत. अंधाराचा फायदा घेत अनेकदा या रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणून टाकली जातात. रस्त्याच्या कडेला धनदाट झाडी असल्याने सापांचे प्रमाणही वाढले आहे. रात्री-बेरात्री वाहनधारकांना सापांचे दर्शन झाले आहे. गेल्याच आठवड्यात किर्लोस्कर कंपनीच्या चौकीदाराला बिबट्याचे रात्री साडेआठच्या सुमारास दर्शन झाले. त्याचवेळी एकलहरेकडे जाणाऱ्या रिक्षावाल्यालाही बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे रिक्षा पुढे नेण्यास त्याने हिंमत केली नाही. बिबट्या किर्लोस्कर टेकडीच्या जंगलात दिसेनासा झाल्यावर रिक्षा पुढे नेली.वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणीया रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत अनेकदा छोट्या-मोठ्या रस्ता लुटीच्या व चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी जोरदार पावसाने विजेच्या तारांवर झाड उन्मळून पडल्याने तारा तुटून लोंबकळत होत्या. तेव्हापासून सुमारे महिना-दीड महिन्याच्या कालावधीत कोणीही दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही, असे नागरिक सांगतात.महानगरपालिका विद्युत विभागाने एकलहरे रस्त्यावरील गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतच्या तुटलेल्या विजेच्या तारा दुरु स्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :electricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका