शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे

By admin | Updated: February 11, 2015 23:37 IST

मुख्यमंत्री : भाजपाच्या दिल्लीतील पराभवामुळे आनंद झालेल्या विरोधकांवर टीका

नाशिक : भारतीय जनता पक्षाने केंद्राबरोबरच राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळविले; मात्र दिल्लीत पक्षाला अपयश आले म्हणून पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे आहे़ तसेच या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या विरोधकांनी हे लक्षात ठेवावे की, दुसऱ्याच्या घरातील मुलाचा आनंद फार काळ साजरा करता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली़ महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत, तर भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या़ यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच अनेक पक्षांनी मोदी लाट कमी झाल्याची वक्तव्ये केली होती़ याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये आम्ही जिंकलो अन् एका राज्यामध्ये हरलो़ जिंकलो त्याचा आनंद साजरा केला, तर हरलो त्याबाबत आत्मपरीक्षण करू़ त्यामुळे विरोधकांनी अशाप्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे़एखाद्या ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष हरला म्हणजे पक्ष प्रमुखाला कसे दोषी धरणार? भाजपाच्या या पराभवाबाबत विरोधी पक्षांकडून आनंद व्यक्त केला जात आहे़ या पराभवाबाबत आम्ही आत्मचिंतन करणार आहोत़ तसेच पराभवाकडून विजयाकडे जाण्याचा पक्षाचा इतिहास असून, जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा मिळवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला़ जीवनातील चांगल्या-वाईट अशा दोन्ही वेळा जो सोबत राहतो तो सहकारी असतो़ जीवनात जेव्हा मागे येण्याची वेळ येते, त्यावेळी सहकाऱ्याने सोबत राहण्याची आवश्यकता असते़ असा टोला लगावून दिल्ली पराभवानंतर टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे सहकाऱ्याची भूमिका समजावून सांगितली़दिल्लीतील निवडणुकीनंतर शिवसेनेने केलेल्या टीकेबाबत अप्रत्यक्षपणे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यावेळी आपण सहकारी म्हणून भूमिका पार पाडीत असतो, त्यावेळी सहकाऱ्याने चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वेळेस सोबत राहायचे असते़ जीवनात कधी-कधी अशा प्रकारची वेळ येते की, थोडे मागे यावे लागते, त्यावेळी जो आपल्यासोबत असतो तो सहकारी़ अशा प्रसंगी सहकाऱ्याने आपल्यासोबत असावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.