शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

देशाला हिंदू राष्ट्र करणे सोपे नाही: रावसाहेब कसबे

By संजय दुनबळे | Updated: July 13, 2023 18:55 IST

मणिपूरमधील धगीचा अर्थ काय ? विषयावर चर्चासत्र

नाशिक : आगामी काळात भारत हे हिंदू राष्ट्र करण्यासाठी जे जे करायला हवे ते करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण या देशात हिंदू राष्ट्र निर्माण करणे अवघड आहे हे मणिपूरच्या घटनेने दाखवून दिले आहे. या देशात अपल्पसंख्याकांचे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय हिंदूंमधीलच काही जातींचा हिंदू राष्ट्राला विरोध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

विचार जागर फाउंडेशनच्या वतीने येथील मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित मणिपूरच्या धगीचा अर्थ काय या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सुरेश भटेवरा, निरंजन टकले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कसबे म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यामुळे निर्माण झालेला प्रश्न आपल्याला काय धडा देणर आहे हे महत्त्वाचे आहे.

या घटनेमागे अनेक कंगोरे आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी जे जे करावे लागणार आहे, ते तेथे केले जात असून, येणाऱ्या निवडणुकीत देशातील जनतेने सत्ता बदल करायला हवा, असे त्यांनी सांगितले. उत्तम कांबळे म्हणाले, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. कोणत्याही जातीचे अथवा धर्माचे नाहीत. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी धग वाढत जाईल. केवळ राखीव जागा हे मणिपूर हिंसाचाराचे एक कारण दिसत असले तरी अन्य भूमिकाही त्यामागे आहेत. जेव्हा व्यवस्थेकडून सामान्य माणसांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, तेव्हा राखीव जागांचे गाजर पुढे केले जात असल्याचेही ते म्हणाले.

निरंजन टकले आणि सुरेश भटेवरा यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा भूप्रदेश, तेथील विविध जाती आणि त्यांचे प्रश्न याविषयीचे विवेचन केले. यावेळी मणिपूरमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन करतानाच तेथील हिंसाचाराची धग उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.