शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 01:56 IST

समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘दिठी’ चित्रपटाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

 

नाशिक सायकियाट्रिक सोसायटी आणि आय.पी.एच. व मनतरंग फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिठी’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण शुक्रवारी आयएमएच्या सभागृहात करण्यात आले. या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना जीवनातील उलथापालथीत बहुतांश माणसे मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचेच विसरून जातात. त्यामुळेच आपल्या कुटुंबातील जिवलगाचा मृत्यू त्यांना सहन होत नाही. त्या दु:खातच ते स्वत:ला बुडवून घेतात. मृत्यूचे अंतिम सत्य आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मोकळे होण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी निमित्त हवे असते. तसे जर झाले तरच आपण एका नव्या दिशेने चालू लागतो. त्यामुळे असा आघात झालेल्या परिघातील प्रत्येकाने तशा स्वरूपाचे प्रयत्न करून आघातग्रस्ताला लवकरात लवकर त्या दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा,असेही आगाशे यांनी नमूद केले. केवळ बुद्धिमतेच्या जोरावर नव्हे, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणावरही ते दु:ख पचवण्याचे भान देता येते, असेही डॉ. आगाशे यांनी सांगितले. दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या लघुकथेवर आधारित असलेला आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ या चित्रपटातून तेच वास्तव मांडण्यात आले आहे. चित्रपटाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक