शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 01:56 IST

समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘दिठी’ चित्रपटाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

 

नाशिक सायकियाट्रिक सोसायटी आणि आय.पी.एच. व मनतरंग फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिठी’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण शुक्रवारी आयएमएच्या सभागृहात करण्यात आले. या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना जीवनातील उलथापालथीत बहुतांश माणसे मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचेच विसरून जातात. त्यामुळेच आपल्या कुटुंबातील जिवलगाचा मृत्यू त्यांना सहन होत नाही. त्या दु:खातच ते स्वत:ला बुडवून घेतात. मृत्यूचे अंतिम सत्य आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मोकळे होण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी निमित्त हवे असते. तसे जर झाले तरच आपण एका नव्या दिशेने चालू लागतो. त्यामुळे असा आघात झालेल्या परिघातील प्रत्येकाने तशा स्वरूपाचे प्रयत्न करून आघातग्रस्ताला लवकरात लवकर त्या दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा,असेही आगाशे यांनी नमूद केले. केवळ बुद्धिमतेच्या जोरावर नव्हे, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणावरही ते दु:ख पचवण्याचे भान देता येते, असेही डॉ. आगाशे यांनी सांगितले. दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या लघुकथेवर आधारित असलेला आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ या चित्रपटातून तेच वास्तव मांडण्यात आले आहे. चित्रपटाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक