शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

चोरट्यांना ‘पर्वणी’ साधणे अशक्य

By admin | Updated: July 2, 2015 00:06 IST

चोरट्यांना ‘पर्वणी’ साधणे अशक्य

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधु-संतांबरोबरच चोऱ्यामाऱ्या करणारेही पर्वणी साधण्याची शक्यता असल्याने लाखोंच्या गर्दीत त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होणार असल्याचे पाहून पोलीस यंत्रणेने आत्तापासूनच त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना तयार केल्या आहेत. नियमित पोलीस बंदोबस्ताबरोबरच परराज्यांतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी त्या त्या राज्यांतील पोलीस पथक तसेच दुभाषकांची मदत घेण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीन महिन्यांच्या काळात शहरात लाखो लोकांचा राबता असेल पण त्यामानाने त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही सोय नसणार अशा वेळी समाजकंटक वा भामट्यांकडून लुटमार, चोऱ्यामाऱ्या होण्याची अधिक शक्यता आहे. पाकिटमारी, सोनसाखळी चोरी त्याचबरोबर महिलांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी भामट्यांकडून ‘पर्वणी’ साधणे अधिक शक्य होणार असल्याने एकीकडे कुंभमेळ्यातील बंदोबस्ताचा ताण तर दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारी घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे उभे ठाकणार असल्याने त्याचा विचार करून पोलीस आयुक्तालयाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे ठरविले आहे. दोन पोलीस उप आयुक्त व दोन सहायक आयुक्त यांच्याबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस बळापैकी काही पोलीस बळ सिंहस्थाव्यतिरिक्त कामासाठी म्हणजेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी वापरण्यात येणार आहे. ज्यांची गुन्हेगारी नियंत्रणासाठी नेमणूक केली जाईल त्यांच्यावर सिंहस्थाचा बंदोबस्त देण्यात येणार नाही. स्थानिक पोलिसांची बहुधा यासाठी नेमणूक केली जाईल जेणेकरून स्थानिक गुंड, गुन्हेगारांची ते ओळख पटवू शकतील असा त्यामागचा हेतू आहे. परंतु या काळात पर जिल्ह्यातून तसेच पर राज्यातूनही आंतरराज्यीय गुन्हेगार येण्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेऊन जेरबंद करणे अवघड असल्याने प्रत्येक जिल्ह्यातून एक पथक बोलविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर राज्यांतील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही पाचारण केले जाईल, विशेष करून ज्यांना भाषेचे ज्ञान आहे अशांना याकामी प्राधान्य असेल. बऱ्याचशा वेळेस परप्रांतीय गुन्हेगारांकडून माहिती काढणे भाषेमुळे अशक्य होते, ते टाळण्यासाठी त्या त्या भाषेतील पारंगत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यास भाषेचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. पर्वणी काळात पोलीस यंत्रणा करणार असलेल्या प्रयत्नांमुळे चोरट्यांना पर्वणी साधणे अशक्य होईल असा दावा केला जात आहे. विशेष करून साध्या वेषातील पोलीस महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिकच काळजी घेतील. (प्रतिनिधी)