शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

भारतीय कायद्याचे पालन हे कर्तव्यच

By admin | Updated: January 26, 2015 00:42 IST

मुफ्ती निजामुद्दीन रजवी : ‘सुन्नी इज्तेमा’चा समारोप; जगाच्या शांततेसाठी सामूहिक ‘दुआ’

जुने नाशिक : आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे. इस्लाम व प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी देशप्रेमाची शिकवण संपूर्ण समाजाला दिली आहे. त्यामुळे भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण आपल्या न्याय-हक्क व अधिकारांची मागणी केली पाहिजे, असा उपदेश ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना मुफ्ती निजामुद्दीन रजवी यांनी केला.सुन्नी दावत-ए-इस्लामी या आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेच्या वतीने शहरातील इदगाह मैदानावर आयोजित दोन दिवसीय धार्मिक मेळाव्याच्या (सुन्नी इज्तेमा)चा आज समारोप झाला. संध्याकाळच्या सत्रात रजवी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, इस्लाम धर्मात वचनाचे पालन करणे व दिलेल्या वचनाबाबत प्रामाणिक राहण्याला मोठे महत्त्व आहे. आपण आपल्या भारताचा कायदा व त्याच्या अस्मितेविषयीदेखील प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. पाश्चात्य संस्कृतीचा मोहजाळात इस्लामी संस्कृती व शिकवणीचा विसर समाजाला पडत चालला आहे. त्यामुळे समाजाची प्रतिमादेखील मलीन होत चालली असून, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण तसेच पैगंबरांची शिकवण, याचा अभ्यास करत येणारी पिढी संस्कारक्षम कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नशील रहावे, असे रजवी यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, मौलाना अब्दुल जब्बार, मौलाना महेबुब आलम, मौलाना आसीफ सय्यद, मौलाना कारी रिजवान खान यांच्यासह आदि धर्मगुरू व उलेमा उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी यांनी अंतिम सत्रात इस्लामची शिकवण व मुहम्मद पैगंबर यांचा सामाजिक दृष्टिकोन याविषयावर प्रकाश टाकला. रात्री साडेनऊ वाजता जगात शांतता टिकून रहावी व भारताची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी सामूहिक ‘दुआ’ झाली.