शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळातही गाजला नाशिकच्या गुन्हेगारीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 01:25 IST

विधिमंडळ अधिवेशनात नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली, असे काही दिसले नाही. संसदेच्या अधिवेशनातही फार काही वेगळे घडले नाही. तरीही नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलाच. सीमा हिरे यांनी भाजप नेता अमोल ईघे याच्या खुनाचा मुद्दा उपस्थित केला. युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी नाशिकपाठोपाठ विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोन विषयांमुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेची चर्चा राज्याच्या राजधानीत झाली. सामान्य नागरिकाच्या हिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या पोलीस दलाने भयमुक्त वातावरणासाठी पावले उचलायला हवी, अशी आता सामान्यांची अपेक्षा आहे.

मिलिंद कुलकर्णीकायदा-सुव्यवस्था धोक्यातवाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा आग्रह, भूमाफियांचा उपद्रव कमी करण्यासाठी मोक्काची कारवाई, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया व्यापाऱ्यांकडून रक्कम वसुली यासारखे जनहिताचे उपक्रम पोलीस दलाने राबविले. जनतेनेदेखील त्यांच्या या पुढाकाराचे भरभरून कौतुक केले. मात्र, भयमुक्त वातावरण नसेल तर सामान्य माणसाचे जगणे असह्य बनेल. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अंगणातील महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले जाण्याच्या घटना नित्य घडत आहेत. मालेगावमध्ये महिनाभरापूर्वी दंगल घडली असताना तेथे पोतेभर तलवारी सापडतात. खुनाच्या घटना, दोन गटात सशस्त्र हाणामाऱ्या असे प्रकार नित्य घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सामान्य जनतेला ‘पोलिसिंग’ दिसायला हवे.अधिवेशनापेक्षा निवडणुकीला महत्त्व६ नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम आटोपली. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्थगित झालेल्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ ११ जागा असल्या तरी बहुमतासाठी एकेक जागेचे महत्त्व असल्याने राजकीय पक्ष पुन्हा या निवडणुकीला गांभीर्याने घेतल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मंत्री निवडणूक प्रचारात उतरले, यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला किती महत्त्व होते, हे लक्षात घ्यावे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना डॉ. भारती पवार या प्रचारात व्यस्त होत्या. आदिवासी भागातील नगरपंचायतींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते.जिंकण्यासाठी प्रशिक्षण उपयोगी पडेल?नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षीयांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी दत्त गेल्या आठवड्यात येऊन गेले. त्यांनीही निवडणुकीसाठी समित्या गठित करण्याचे सूतोवाच केले. यापूर्वी शिवसेनेने समिती गठित केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युवा सेनेचे राज्य अधिवेशन नाशकात होऊ घातले आहे. वरुण सरदेसाई यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर युवा सेनेत चैतन्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपनेदेखील इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले. नगरसेवक व इच्छुक उमेदवार त्याला उपस्थित होते. पट्टीचे प्रशिक्षक भाजपमध्ये आहेतच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, युवासेनेचे अधिवेशन आणि भाजपच्या प्रशिक्षणाचा निवडणुकीत खरोखर उपयोग होईल का? तिथली समीकरणे तर वेगळीच असतात ना!सिन्नरमध्ये भाऊबंदकीआमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या गावातील संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. यात काही विशेष नाही. आमदार म्हणून त्यांचा तालुक्यात दबदबा असताना स्वत:च्या गावात यश मिळविणे कठीण नाही. पण स्वत:चा भाऊ विरोधात असताना कोकाटे यांनी हे यश मिळविले. पण त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. आमदारांचे बंधू भारत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याची घोषणा केली. भारत यांचे सध्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. आमदार कन्या सिमंतिनी ज्या देवपूर गटातून निवडून आल्या, त्या गटासाठी भारत कोकाटे इच्छुक आहेत. भाऊबंदकीचा हा खरा वाद आहे.
टॅग्स :Nashikनाशिक