शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

विधिमंडळातही गाजला नाशिकच्या गुन्हेगारीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 01:25 IST

विधिमंडळ अधिवेशनात नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली, असे काही दिसले नाही. संसदेच्या अधिवेशनातही फार काही वेगळे घडले नाही. तरीही नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलाच. सीमा हिरे यांनी भाजप नेता अमोल ईघे याच्या खुनाचा मुद्दा उपस्थित केला. युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी नाशिकपाठोपाठ विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोन विषयांमुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेची चर्चा राज्याच्या राजधानीत झाली. सामान्य नागरिकाच्या हिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या पोलीस दलाने भयमुक्त वातावरणासाठी पावले उचलायला हवी, अशी आता सामान्यांची अपेक्षा आहे.

मिलिंद कुलकर्णीकायदा-सुव्यवस्था धोक्यातवाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा आग्रह, भूमाफियांचा उपद्रव कमी करण्यासाठी मोक्काची कारवाई, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया व्यापाऱ्यांकडून रक्कम वसुली यासारखे जनहिताचे उपक्रम पोलीस दलाने राबविले. जनतेनेदेखील त्यांच्या या पुढाकाराचे भरभरून कौतुक केले. मात्र, भयमुक्त वातावरण नसेल तर सामान्य माणसाचे जगणे असह्य बनेल. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अंगणातील महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले जाण्याच्या घटना नित्य घडत आहेत. मालेगावमध्ये महिनाभरापूर्वी दंगल घडली असताना तेथे पोतेभर तलवारी सापडतात. खुनाच्या घटना, दोन गटात सशस्त्र हाणामाऱ्या असे प्रकार नित्य घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सामान्य जनतेला ‘पोलिसिंग’ दिसायला हवे.अधिवेशनापेक्षा निवडणुकीला महत्त्व६ नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम आटोपली. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्थगित झालेल्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ ११ जागा असल्या तरी बहुमतासाठी एकेक जागेचे महत्त्व असल्याने राजकीय पक्ष पुन्हा या निवडणुकीला गांभीर्याने घेतल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मंत्री निवडणूक प्रचारात उतरले, यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला किती महत्त्व होते, हे लक्षात घ्यावे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना डॉ. भारती पवार या प्रचारात व्यस्त होत्या. आदिवासी भागातील नगरपंचायतींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते.जिंकण्यासाठी प्रशिक्षण उपयोगी पडेल?नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षीयांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी दत्त गेल्या आठवड्यात येऊन गेले. त्यांनीही निवडणुकीसाठी समित्या गठित करण्याचे सूतोवाच केले. यापूर्वी शिवसेनेने समिती गठित केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युवा सेनेचे राज्य अधिवेशन नाशकात होऊ घातले आहे. वरुण सरदेसाई यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर युवा सेनेत चैतन्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपनेदेखील इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले. नगरसेवक व इच्छुक उमेदवार त्याला उपस्थित होते. पट्टीचे प्रशिक्षक भाजपमध्ये आहेतच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, युवासेनेचे अधिवेशन आणि भाजपच्या प्रशिक्षणाचा निवडणुकीत खरोखर उपयोग होईल का? तिथली समीकरणे तर वेगळीच असतात ना!सिन्नरमध्ये भाऊबंदकीआमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या गावातील संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. यात काही विशेष नाही. आमदार म्हणून त्यांचा तालुक्यात दबदबा असताना स्वत:च्या गावात यश मिळविणे कठीण नाही. पण स्वत:चा भाऊ विरोधात असताना कोकाटे यांनी हे यश मिळविले. पण त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. आमदारांचे बंधू भारत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याची घोषणा केली. भारत यांचे सध्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. आमदार कन्या सिमंतिनी ज्या देवपूर गटातून निवडून आल्या, त्या गटासाठी भारत कोकाटे इच्छुक आहेत. भाऊबंदकीचा हा खरा वाद आहे.
टॅग्स :Nashikनाशिक