शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

विधिमंडळातही गाजला नाशिकच्या गुन्हेगारीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 01:25 IST

विधिमंडळ अधिवेशनात नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली, असे काही दिसले नाही. संसदेच्या अधिवेशनातही फार काही वेगळे घडले नाही. तरीही नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलाच. सीमा हिरे यांनी भाजप नेता अमोल ईघे याच्या खुनाचा मुद्दा उपस्थित केला. युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी नाशिकपाठोपाठ विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोन विषयांमुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेची चर्चा राज्याच्या राजधानीत झाली. सामान्य नागरिकाच्या हिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या पोलीस दलाने भयमुक्त वातावरणासाठी पावले उचलायला हवी, अशी आता सामान्यांची अपेक्षा आहे.

मिलिंद कुलकर्णीकायदा-सुव्यवस्था धोक्यातवाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा आग्रह, भूमाफियांचा उपद्रव कमी करण्यासाठी मोक्काची कारवाई, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया व्यापाऱ्यांकडून रक्कम वसुली यासारखे जनहिताचे उपक्रम पोलीस दलाने राबविले. जनतेनेदेखील त्यांच्या या पुढाकाराचे भरभरून कौतुक केले. मात्र, भयमुक्त वातावरण नसेल तर सामान्य माणसाचे जगणे असह्य बनेल. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अंगणातील महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले जाण्याच्या घटना नित्य घडत आहेत. मालेगावमध्ये महिनाभरापूर्वी दंगल घडली असताना तेथे पोतेभर तलवारी सापडतात. खुनाच्या घटना, दोन गटात सशस्त्र हाणामाऱ्या असे प्रकार नित्य घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सामान्य जनतेला ‘पोलिसिंग’ दिसायला हवे.अधिवेशनापेक्षा निवडणुकीला महत्त्व६ नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम आटोपली. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्थगित झालेल्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ ११ जागा असल्या तरी बहुमतासाठी एकेक जागेचे महत्त्व असल्याने राजकीय पक्ष पुन्हा या निवडणुकीला गांभीर्याने घेतल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मंत्री निवडणूक प्रचारात उतरले, यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला किती महत्त्व होते, हे लक्षात घ्यावे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना डॉ. भारती पवार या प्रचारात व्यस्त होत्या. आदिवासी भागातील नगरपंचायतींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते.जिंकण्यासाठी प्रशिक्षण उपयोगी पडेल?नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षीयांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी दत्त गेल्या आठवड्यात येऊन गेले. त्यांनीही निवडणुकीसाठी समित्या गठित करण्याचे सूतोवाच केले. यापूर्वी शिवसेनेने समिती गठित केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युवा सेनेचे राज्य अधिवेशन नाशकात होऊ घातले आहे. वरुण सरदेसाई यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर युवा सेनेत चैतन्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपनेदेखील इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले. नगरसेवक व इच्छुक उमेदवार त्याला उपस्थित होते. पट्टीचे प्रशिक्षक भाजपमध्ये आहेतच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, युवासेनेचे अधिवेशन आणि भाजपच्या प्रशिक्षणाचा निवडणुकीत खरोखर उपयोग होईल का? तिथली समीकरणे तर वेगळीच असतात ना!सिन्नरमध्ये भाऊबंदकीआमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या गावातील संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. यात काही विशेष नाही. आमदार म्हणून त्यांचा तालुक्यात दबदबा असताना स्वत:च्या गावात यश मिळविणे कठीण नाही. पण स्वत:चा भाऊ विरोधात असताना कोकाटे यांनी हे यश मिळविले. पण त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. आमदारांचे बंधू भारत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याची घोषणा केली. भारत यांचे सध्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. आमदार कन्या सिमंतिनी ज्या देवपूर गटातून निवडून आल्या, त्या गटासाठी भारत कोकाटे इच्छुक आहेत. भाऊबंदकीचा हा खरा वाद आहे.
टॅग्स :Nashikनाशिक