शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर धरणाच्या नवीन गेट, खोलीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन गेट आणि धरणातील ...

सायखेडा : गोदाकाठ भागातील नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन गेट आणि धरणातील गाळ काढून साठा वाढविण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले ते शिंगवे येथे बोलत होते.

गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असली की नदीला पाणी वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, या गावांना पुराचा वेडा बसतो. शेती पाण्याखाली जाऊन पिके खराब होतात, जमीन नापीक होते, हंगाम वाया जातो. दुकानात पाणी जाते. व्यवसाय बंद पडतात. व्यापारीवर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यासाठी पर्याय म्हणून धरणावरील पाणी वाहून जाईल अशा गेटची संख्या वाढली पाहिजे आणि धरणाच्या गेटअगोदर काही अंतरावर नदीत असणारा गाळ बाहेर काढून पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे हे दोन्ही पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. जेव्हा दोन्ही कामे होतील तेव्हा पाणी नदीत वाहून जाईल आणि पुराचा धोका टळेल, पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, शेती आणि पिके यांची नासाडी होणार नाही, घरे पाण्याखाली जाणार नाहीत, व्यवसाय सुस्थितीत राहातील.

यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यामार्फत मोठा निधी आणून प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सागर कुंदे, धोंडीराम रायते, भगीरथ गिते, भूषण शिंदे, विजय कारे, गणेश खेलूकर, राजेंद्र कुटे, राजेंद्र सांगळे, वसंत जाधव, मंगेश राजोळे, संजय डेर्ले उपस्थित होते.