शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

सदोष योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:47 IST

दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्याने पाणीटंचाई जाणवू लागताच तालुका प्रशासनाने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्याने पाणीटंचाई जाणवू लागताच तालुका प्रशासनाने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. मात्र सदोष नळ-पाणीपुरवठा योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठ्याचा जाच तालुकावासीयांना सहन करावा लागत असतो.दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावात नळ पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे मात्र काही ठिकाणी सदोष पद्धतीने योजना झाल्याने तसेच विजेच्या लोडशेडिंगमुळे काही गावांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त असून, वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अडचण होत असल्याच्या तक्रारी आहेत. दिंडोरी शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर येथे कूपनलिकेवर पाण्यासाठी नेहमी गर्दी असते. येथील नागरिकांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी आहे.भारत निर्माण योजना ही वादग्रस्त ठरली असून, काही ठिकाणी या योजनेबाबत तक्रारी होऊन फौजदारी कारवाईही झाली आहे. जीवन प्राधिकरणच्या काही योजनांचेही काम ९० टक्के पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत. राष्ट्रीय पेयजल असो की भारत निर्माण दोन्ही योजना होऊन काही दिवसातच त्या दुरुस्तीवर आल्याच्याही तक्रारी आहेत. तालुक्यात सात धरणे, १५ लघु पाटबंधारे व अनेक पाझर तलाव असून, ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील ४४ गावे वणी, दिंडोरी या शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण गेले चार वर्षे सलग भरल्याने पाणीटंचाई जाणवत नाही. पालखेड धरणातून पिंपळगाव बसवंत, ओझर, मोहाडी, साकोरे, जानोरी या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून, धरणात पाणी असल्याने टंचाई नाही.------पंचायत समितीतर्फे टंचाई कृती आराखडा बनवत त्यावर कार्यवाही केली आहे. आठ गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींचे पाणी कमी झाले होते. त्यामुळे तातडीने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहित केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. तालुक्यात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.- चंद्रकांत भावसार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी

टॅग्स :Nashikनाशिक