शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सदोष योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:47 IST

दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्याने पाणीटंचाई जाणवू लागताच तालुका प्रशासनाने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्याने पाणीटंचाई जाणवू लागताच तालुका प्रशासनाने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. मात्र सदोष नळ-पाणीपुरवठा योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठ्याचा जाच तालुकावासीयांना सहन करावा लागत असतो.दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावात नळ पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे मात्र काही ठिकाणी सदोष पद्धतीने योजना झाल्याने तसेच विजेच्या लोडशेडिंगमुळे काही गावांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त असून, वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अडचण होत असल्याच्या तक्रारी आहेत. दिंडोरी शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर येथे कूपनलिकेवर पाण्यासाठी नेहमी गर्दी असते. येथील नागरिकांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी आहे.भारत निर्माण योजना ही वादग्रस्त ठरली असून, काही ठिकाणी या योजनेबाबत तक्रारी होऊन फौजदारी कारवाईही झाली आहे. जीवन प्राधिकरणच्या काही योजनांचेही काम ९० टक्के पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत. राष्ट्रीय पेयजल असो की भारत निर्माण दोन्ही योजना होऊन काही दिवसातच त्या दुरुस्तीवर आल्याच्याही तक्रारी आहेत. तालुक्यात सात धरणे, १५ लघु पाटबंधारे व अनेक पाझर तलाव असून, ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील ४४ गावे वणी, दिंडोरी या शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण गेले चार वर्षे सलग भरल्याने पाणीटंचाई जाणवत नाही. पालखेड धरणातून पिंपळगाव बसवंत, ओझर, मोहाडी, साकोरे, जानोरी या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून, धरणात पाणी असल्याने टंचाई नाही.------पंचायत समितीतर्फे टंचाई कृती आराखडा बनवत त्यावर कार्यवाही केली आहे. आठ गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींचे पाणी कमी झाले होते. त्यामुळे तातडीने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहित केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. तालुक्यात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.- चंद्रकांत भावसार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी

टॅग्स :Nashikनाशिक