शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

ग्रामपंचायतीत विलगीकरण कक्षासाठी प्रस्ताव मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:26 IST

कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला असला तरी देशपातळीवर तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच कमीत कमी ३० खाटांचे विलगीकरण उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात येणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.    दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांना सूचना : ३० खाटांची हाेणार सोय

नाशिक : कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला असला तरी देशपातळीवर तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच कमीत कमी ३० खाटांचे विलगीकरण उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात येणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.    दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गावपातळीवर कोरोना रुग्णांवर उपचाराची कोणतीच सोय नव्हती. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांचे मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर झाले होते. कोरोनासदृश्य कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना कुटुंबीयांपासून अलग ठेवून  त्याच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले हाेते, तर काही गावांमध्ये शाळा, समाजमंदिरात संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या पातळीवरच ३० खाटांचे विलगीकरण कक्ष करण्याचा  निर्णय शासनाने घेतला असून,  त्यासाठी ग्रामपंचायतींना गेल्यावर्षी प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून २५ टक्के रक्कम याकामी खर्च करण्यात येणार असून, ते खर्चाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या संदर्भात विकास आराखडा तयार करावा त्याचबरोबर गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवकांनी ही कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींचा होकार महत्त्वाचाग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्याची व त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुभा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी, त्यासाठी ग्रामपंचायतींची परवानगी व मागणी महत्त्वाची मानली आहे. साधारणत: ३० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या