शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:57 IST

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या ...

ठळक मुद्दे  पुरातत्व खात्याच्या कार्यालयामुळे अडचण, स्थलांतराची मागणी

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या अलीकडे हॉटेल तुळजाजवळ समांतर रस्त्यावरच वाटावी इतकी रस्त्यात असलेली एक जुन्या बांधकामाची बैठी इमारत आहे. गेल्या सुमारे दोन अडीच दशकांपासून येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कार्यालय याच इमारतीत असून, तेथूनच पांडवलेणी व अन्य गोष्टींचे कामकाज चालते. मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होण्याआधी ही इमारत समांतर रस्त्यापासून लांब आणि खूपच दूर हाती. परंतु कालौघात रस्ते मोठे व रु ंद झाल्याने इमारतीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. परिणामी दोन्ही बाजूने वापर असलेल्या या सर्व्हिस रस्त्यावर या इमारतीमुळे अपघात होऊ लागले आहेत. पाथर्डी फाट्याकडून फाळके स्मारकाकडे जाणाºया वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. म्हणजेच ब्लार्इंड टर्न असून या ठिकाणी थोडेसे वळणही असल्याने वाहनांना अरु ंद रस्त्यामुळे अपघात होत आहे.या इमारतीविषयी येथील रहिवासी पांडुरंग शिरसाठ सांगतात की, ही इमारत खूप जुनी असून धर्मराज मित्र मंडळांनी ती वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधली होती. सातबारावर तिचा चावडी म्हणून उल्लेख असल्याचा शिरसाठ यांच्यासह परिसरातील नागरिकांचा दावा आहे. कालांतराने येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय सुरू झाले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ताबापत्र, नोंदणी अशी कोणतेही कागदपत्र नाहीत, मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल कार्यालयाच्या नावाने येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी अनिभज्ञता दर्शवत असून, गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे इथेच कार्यालय असल्याने ते अनधिकृत नसल्याचे सांगतात. ही इमारत अधिकृत की अनधिकृत किंवा कोणाच्या नावे या तांत्रिक बाबींचा काय तो शोध लावावा व आता ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने अतिक्रमित ठरवून ती महामार्ग प्राधिकरणाने हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.