शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:57 IST

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या ...

ठळक मुद्दे  पुरातत्व खात्याच्या कार्यालयामुळे अडचण, स्थलांतराची मागणी

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या अलीकडे हॉटेल तुळजाजवळ समांतर रस्त्यावरच वाटावी इतकी रस्त्यात असलेली एक जुन्या बांधकामाची बैठी इमारत आहे. गेल्या सुमारे दोन अडीच दशकांपासून येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कार्यालय याच इमारतीत असून, तेथूनच पांडवलेणी व अन्य गोष्टींचे कामकाज चालते. मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होण्याआधी ही इमारत समांतर रस्त्यापासून लांब आणि खूपच दूर हाती. परंतु कालौघात रस्ते मोठे व रु ंद झाल्याने इमारतीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. परिणामी दोन्ही बाजूने वापर असलेल्या या सर्व्हिस रस्त्यावर या इमारतीमुळे अपघात होऊ लागले आहेत. पाथर्डी फाट्याकडून फाळके स्मारकाकडे जाणाºया वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. म्हणजेच ब्लार्इंड टर्न असून या ठिकाणी थोडेसे वळणही असल्याने वाहनांना अरु ंद रस्त्यामुळे अपघात होत आहे.या इमारतीविषयी येथील रहिवासी पांडुरंग शिरसाठ सांगतात की, ही इमारत खूप जुनी असून धर्मराज मित्र मंडळांनी ती वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधली होती. सातबारावर तिचा चावडी म्हणून उल्लेख असल्याचा शिरसाठ यांच्यासह परिसरातील नागरिकांचा दावा आहे. कालांतराने येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय सुरू झाले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ताबापत्र, नोंदणी अशी कोणतेही कागदपत्र नाहीत, मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल कार्यालयाच्या नावाने येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी अनिभज्ञता दर्शवत असून, गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे इथेच कार्यालय असल्याने ते अनधिकृत नसल्याचे सांगतात. ही इमारत अधिकृत की अनधिकृत किंवा कोणाच्या नावे या तांत्रिक बाबींचा काय तो शोध लावावा व आता ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने अतिक्रमित ठरवून ती महामार्ग प्राधिकरणाने हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.