शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:57 IST

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या ...

ठळक मुद्दे  पुरातत्व खात्याच्या कार्यालयामुळे अडचण, स्थलांतराची मागणी

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या अलीकडे हॉटेल तुळजाजवळ समांतर रस्त्यावरच वाटावी इतकी रस्त्यात असलेली एक जुन्या बांधकामाची बैठी इमारत आहे. गेल्या सुमारे दोन अडीच दशकांपासून येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कार्यालय याच इमारतीत असून, तेथूनच पांडवलेणी व अन्य गोष्टींचे कामकाज चालते. मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होण्याआधी ही इमारत समांतर रस्त्यापासून लांब आणि खूपच दूर हाती. परंतु कालौघात रस्ते मोठे व रु ंद झाल्याने इमारतीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. परिणामी दोन्ही बाजूने वापर असलेल्या या सर्व्हिस रस्त्यावर या इमारतीमुळे अपघात होऊ लागले आहेत. पाथर्डी फाट्याकडून फाळके स्मारकाकडे जाणाºया वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. म्हणजेच ब्लार्इंड टर्न असून या ठिकाणी थोडेसे वळणही असल्याने वाहनांना अरु ंद रस्त्यामुळे अपघात होत आहे.या इमारतीविषयी येथील रहिवासी पांडुरंग शिरसाठ सांगतात की, ही इमारत खूप जुनी असून धर्मराज मित्र मंडळांनी ती वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधली होती. सातबारावर तिचा चावडी म्हणून उल्लेख असल्याचा शिरसाठ यांच्यासह परिसरातील नागरिकांचा दावा आहे. कालांतराने येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय सुरू झाले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ताबापत्र, नोंदणी अशी कोणतेही कागदपत्र नाहीत, मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल कार्यालयाच्या नावाने येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी अनिभज्ञता दर्शवत असून, गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे इथेच कार्यालय असल्याने ते अनधिकृत नसल्याचे सांगतात. ही इमारत अधिकृत की अनधिकृत किंवा कोणाच्या नावे या तांत्रिक बाबींचा काय तो शोध लावावा व आता ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने अतिक्रमित ठरवून ती महामार्ग प्राधिकरणाने हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.