शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गुंतवणूकदारांना सुमित कंपनी लिलावात विकू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:31 IST

वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्रमाणेच हा उद्योगदेखील गुणवणूक करून पडून राहील.

सातपूर : वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्रमाणेच हा उद्योगदेखील गुणवणूक करून पडून राहील.अंबड औद्योगिक वसाहतीतील मशीन टूल्स कंपनी गेल्या २१ वर्षांपासून बंद पडलेली आहे. बँकांची देणी थकल्याने वसुली न्यायप्राधिकरणाने ही कंपनी लिलावात काढली आहे. ६ फेब्रुवारी रोजी या कंपनीची चौथी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अतिशय प्राइम लोकेशनवर सुमारे नऊ एकर जागेवर ही कंपनी आहे. कधी काळी या कंपनीने नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतीत चांगला नावलौकिक मिळविलेला होता. १९९७ साली कंपनी बंद पडली आणि कंपनीतील २११ कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली. या कामगारांचे १४ कोटी रुपयांची देणी मिळावी, अशी मागणी आहे. वसुली न्यायप्राधिकरणाने यापूर्वी तीन वेळा लिलावप्रक्रिया राबविली आहे. आता चवथ्या वेळी ही प्रक्रिया राबविली जात आहे. यावेळी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या अनेक कंपन्या धनदांडग्या गुंतवणूकदारांनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता या कारखान्यांच्या जागेवर पुन्हा उद्योग सुरू होणे अपेक्षित होते.तसे न झाल्याने हे उद्योग अनुत्पादक ठरले आहेत. एकीकडे नवीन उद्योगांना जागा मिळत नाहीत. अनेक उद्योजक भाड्याची जागा घेऊन उद्योग चालवीत आहेत, तर दुसरीकडे धनदांडग्यांनी जागा अडकवून ठेवलेल्या आहेत. याबाबत एमआयडीसीने धोरणात्मक निर्णय घेऊन या जागा ताब्यात घेऊन उद्योगासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे. असाच प्रकार सुमित मशीन टुल्स कंपनीबाबत घडू नये, अशी आग्रही मागणी आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमित कंपनी वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढली आहे. लिलाव प्रक्रिया राबविताना एमआयडीसीने धोरणात्मक निर्णय घेऊन ही कंपनी विकत घेणाºयास उद्योग लवकर सुरू करण्याची अट घातली पाहिजे. केवळ गुंतवणूक करणाºयांना अटकाव केला पाहिजे. गरजू उद्योजकांना यात जागा कशी मिळेल याचा विचार करणे गरजेचे आहे.- संजय महाजन, अध्यक्ष, लघुउद्योग भारतीबंद पडलेल्या उद्योगांची जागा गुंतवणूकदारांना अजिबात विकू नये. एखाद्या उद्योजकाने ही जागा विकत घेऊन त्या जागेवर लहान लहान प्लॉट करून गरजू उद्योजकांना द्यावेत. किंवा काही उद्योजकांनी एकत्र येऊन सोसायटी स्थापन करून उद्योग सुरू करावेत. तशी एमआयडीसीकडे योजना आहे. सुमित कंपनीच्या साडेआठ एकर जागेवर ५०० चौरस मीटरचे ३० ते ३५ प्लॉट तयार होऊ शकतील. काही धनदांडग्या गुंतवणूकदारांनी सातपूर, अंबडमधील बंद पडलेल्या कंपन्या विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर एमआयडीसीने कारवाई करणे गरजेचे आहे.  -प्रदीप पेशकार, प्रदेश अध्यक्ष उद्योग आघाडी.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक