शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बिनचेहऱ्याच्या झुंडींचे मुक्त विचारांवर आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:43 IST

प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देखांडेकर : सावानाचा जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नाशिक : प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि.१७) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे राजीव खांडेकर यांना प्रेसक्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतदार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारास उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने यांच्यासह सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, अभिजित कुलकर्णी, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी खांडेकर म्हणाले, सोशल मीडियातून प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले अंधारातले लोक मुक्त विचार मांडणाºयांसह विविध राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांनाही लक्ष करतात. अशा प्रकारांतून ते मुक्त विचार मांडणाºयांचा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतात. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संगीता बाफना यांनी केले, तर डॉ. शंकर बोºहाडे यांनी आभार मानले.आता अशा बिनचेहºयाच्या झुंडीच सध्या सोशल मीडियावर वावरत असून, याची सुरुवात भाजपाने २०१४च्या निवडणुकीत केली, त्यावेळी अशा झुंडी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून संबोधत होत्या. आता दुसºया झुंडी त्याच नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ असे संबोधत आहेत. सोशल माध्यमांवरील या युद्धात, प्रमुख प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक