शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

बिनचेहऱ्याच्या झुंडींचे मुक्त विचारांवर आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:43 IST

प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देखांडेकर : सावानाचा जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नाशिक : प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि.१७) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे राजीव खांडेकर यांना प्रेसक्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतदार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारास उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने यांच्यासह सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, अभिजित कुलकर्णी, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी खांडेकर म्हणाले, सोशल मीडियातून प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले अंधारातले लोक मुक्त विचार मांडणाºयांसह विविध राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांनाही लक्ष करतात. अशा प्रकारांतून ते मुक्त विचार मांडणाºयांचा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतात. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संगीता बाफना यांनी केले, तर डॉ. शंकर बोºहाडे यांनी आभार मानले.आता अशा बिनचेहºयाच्या झुंडीच सध्या सोशल मीडियावर वावरत असून, याची सुरुवात भाजपाने २०१४च्या निवडणुकीत केली, त्यावेळी अशा झुंडी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून संबोधत होत्या. आता दुसºया झुंडी त्याच नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ असे संबोधत आहेत. सोशल माध्यमांवरील या युद्धात, प्रमुख प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक