शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तर घुसखोरांमुळे शहर ठरेल ‘डेंजर झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 22:51 IST

नाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच हीच बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांना सूचितही केले आहे. परंतु त्यानंतरही शहराच्या सीमा सील झालेल्याच दिसत नसल्याने भविष्यात नाशिकचे मालेगाव झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.

ठळक मुद्देनिर्बंध शिथिल : कोणीही शहरात सहज करू शकतो प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच हीच बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांना सूचितही केले आहे. परंतु त्यानंतरही शहराच्या सीमा सील झालेल्याच दिसत नसल्याने भविष्यात नाशिकचे मालेगाव झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.कोरोनाचा संसर्ग अत्यंत सहजगत्या वाढू शकतो हे लक्षात घेऊन केंद्र आणिराज्य शासनाने लॉकडाउन संचारबंदीचा कटू निर्णय जाहीर केला. त्यातील दोन टप्पे संपले परंतु या काळातदेखील काळजी घेतली गेली जात नसल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अखेरीस लॉकडाउनचा तिसरा टप्पा घोषित करण्यात आला. परंतु नाशिक जिल्ह्यात पहिला टप्पा संपत नाही तोच शिथिलता आल्याचे दिसत आहे. विशेष: बाहेरून घुसखोरी करणारे विनासायास शहरात येत असल्याने नाशिक शहरातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे.शहरात आता महापालिकेच्या म्हणण्यानुसारच बाधितांची संख्या अठरावर पोहोचली आहे. यातील तीनेक रुग्ण नाशिक शहरातील मूळ रहिवासी आहेत. बाकी अन्य सर्वच जण बाहेरील असून, त्यांच्यामुळेच शहरात संसर्ग वाढला आहे. यापूर्वी शहरात घुसखोरी करणाऱ्या कामगारांना अडवल्यानंतर क्वारंटाइन असताना तो कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते. त्यानंतर मानखुर्दवरून नाशिकमार्गे जाणाºया सुरक्षारक्षकांपैकी एकाला कोरोना झाल्याचे आढळले होते. आता तर गेल्या काही दिवसांत मालेगाव येथे कोरोनाबाधितांचा उद्रेक झाल्यानंतर तेथून तसेच धुळे तसेच जळगावहून नाशिक शहरात छुप्या पद्धतीने येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढू लागला आहे.पोलिसांच्या नाकाखालून येऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करताच शहरातील विविध वसाहतींमध्ये वास्तव्याला जाणाºयांमुळे शहरात कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो. हीच स्थिती लक्षात घेऊन महपाौर सतीश कुलकर्णी यांनी गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना शहराच्या आणि जिल्ह्यांच्या सीमांवर सीआरपीएफ जवान नियुक्त करण्याची मागणी केली होती. पाठोपाठ आयुक्त राधाकृष्ण गमे यानीदेखील पोलिसांना पत्र दिले आहेत.बाहेरून आलेला रुग्णशहरात शिरलेल्या सिक्युरिटीला लागण मानखुर्दवरून भंडारदरा येथे जाण्यासाठी निघालेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या मित्रांसह शहरात प्रवेश केला. मानखुर्द येथेच त्यांच्यातील एकाला लागण झाल्याचा त्यांना संशय होता. पाथर्डी फाटा येथे (विनाअटकाव) आल्यानंतर मात्र त्यांनी स्वत:हूनच मनपाच्या रुग्णालयात दाखल होऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.दुधाच्या टॅँकरमधून सहज प्रवासजळगाव जिल्ह्यातील भडगाव येथून टॅँकरमधून चोरीछुपे नाशिक शहरात दाखल झालेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी (दि.२) स्पष्ट झाले. दूध टॅँकर आणि तत्सम मालवाहतूक साधनांची कशाप्रकारे सीमा नाक्यावर तपासणी होते हेच यातून स्पष्ट होते आहे.नाशिक शहरात चोरी-छुपे येणाºयांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२) एकाच दिवसात सहा ते आठ रुग्ण वाढले. त्याचेच हे परिणाम आहेत. एकीकडे शहरातील स्थिती नियंत्रित असल्याने शहराचा आॅरेंज झोनमध्ये समावेश करण्याची मागणी असताना दुसरीकडे मात्र रुग्ण संख्या वाढत आहे. आता तरी सीमा कडेकोट बंद कराव्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.- सतीश कुलकर्णी, महापौर

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या