शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

गरीब कल्याण योजनेचा गहू-तांदूळ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:18 IST

नाशिक : लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आता गहूदेखील मिळणार असून, जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदूळ पुरेसा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र रेशनच्या अनेक योजना सुरू असल्याने ग्राहकांना रेशनधान्याची माहिती मिळण्यात गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारीतही वाढ झालेली आहे.

ठळक मुद्दे३५ लाख लाभार्थी : दुसरीकडे धान्य मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार

नाशिक : लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आता गहूदेखील मिळणार असून, जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदूळ पुरेसा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र रेशनच्या अनेक योजना सुरू असल्याने ग्राहकांना रेशनधान्याची माहिती मिळण्यात गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारीतही वाढ झालेली आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे ३५ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना यापूर्वी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आलेला आहे. आता या योजनेतून गहूदेखील वितरित केला जाणार आहे. ग्राहकांना आता प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. जिल्ह्यासाठी या योजनेनुसार अन्नधान्य वाटपासाठी १८०० मेट्रिक टन गहू व तांदळाची गरज असून, जुलै महिन्याचा स्टॉक उचलण्याचे काम रेशन दुकानदारांकडून सुरू करण्यात आला आहे.करोना संकटात लॉकडाऊनमुळे गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून प्रति लाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात एकूण १८ लाख ९९ हजार ३३० रेशनकार्डधारकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असल्याचे पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले.या योजनेतील लाभर्थ्यांसाठी महिन्याला गहू ११०० क्विंटल, तर ७०० क्विंटल तांदळाच्या स्टॉकची गरज आहे. जुलै महिन्याच्या एकूण धान्य साठ्यापैकी ६० टक्के अन्नधान्य उचलून त्याचे रेशन दुकानदारांनी वाटप केले आहे, तर उर्वरित साठा उचलण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने येत्या ७ आॅगस्टपर्यंतची रेशन दुकानदारांना मुदतवाढ दिली असल्याचे सांगण्यात आले.डाळ मिळत नसल्याची तक्रारया योजनेंतर्गत एक किलो डाळदेखील दिली जाते. मात्र अनेक ग्राहकांकडून डाळ मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. नेमकी कोणती डाळ मिळणार, डाळ आली आहे किंवा नाही याबाबत ग्राहकांचा गोंधळ उडविणारी माहिती दिली जात आहे. पुरवठा विभागालादेखील डाळीबाबतची पुरेशी माहिती सांगता आलेली नाही.

 

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकGovernmentसरकार