शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुलाखतीतून भाजपचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:46 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच ‘आमदारकीची’ स्वप्ने पडत असल्याने या मुलाखतीच्या निमित्ताने पक्षाबरोबरच इच्छुकांनाही मतदार-संघातील स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले असता, त्यातील चार उमेदवार निवडून आले आहेत. या चारमध्ये तीन आमदार एकट्या नाशिक शहरातील असून, एक जागा चांदवड मतदारसंघातील पटकावली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत युतीने जिल्ह्णातील दोन्ही जागा जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असल्या तरी, राजकीय नेत्यांच्या पक्षांतरात भारतीय जनता पक्षाच्या वाट्यास जिल्ह्णातून फारसे काही हाती लागलेले नाही. अशा परिस्थितीतही भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असून, युतीच्या जागा वाटपात सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनही भाजपा इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर भाजपाच्याच ताब्यात असलेल्या मतदारसंघातही चार ते पाच इच्छुक तयार आहेत. परिणामी उमेदवारी देताना इच्छुकांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच इच्छुकांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करून स्वत:ची दावेदावी दामटण्यास सुरुवात झाली आहे.पक्षाने येत्या बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुलाखतीची तयारी सुरू केली असून, प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेबरोबर युती करून भाजप निवडणूक लढविणार असल्याने पंधरा मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी का? असा सवाल शिवसेनेनेही उपस्थित करण्यास सुरुवात केली असून, भाजपच्या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या व जागावाटपात संभाव्य मतदारसंघ सुटण्याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक