शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मुलाखतीतून भाजपचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:46 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच ‘आमदारकीची’ स्वप्ने पडत असल्याने या मुलाखतीच्या निमित्ताने पक्षाबरोबरच इच्छुकांनाही मतदार-संघातील स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले असता, त्यातील चार उमेदवार निवडून आले आहेत. या चारमध्ये तीन आमदार एकट्या नाशिक शहरातील असून, एक जागा चांदवड मतदारसंघातील पटकावली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत युतीने जिल्ह्णातील दोन्ही जागा जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असल्या तरी, राजकीय नेत्यांच्या पक्षांतरात भारतीय जनता पक्षाच्या वाट्यास जिल्ह्णातून फारसे काही हाती लागलेले नाही. अशा परिस्थितीतही भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असून, युतीच्या जागा वाटपात सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनही भाजपा इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर भाजपाच्याच ताब्यात असलेल्या मतदारसंघातही चार ते पाच इच्छुक तयार आहेत. परिणामी उमेदवारी देताना इच्छुकांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच इच्छुकांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करून स्वत:ची दावेदावी दामटण्यास सुरुवात झाली आहे.पक्षाने येत्या बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुलाखतीची तयारी सुरू केली असून, प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेबरोबर युती करून भाजप निवडणूक लढविणार असल्याने पंधरा मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी का? असा सवाल शिवसेनेनेही उपस्थित करण्यास सुरुवात केली असून, भाजपच्या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या व जागावाटपात संभाव्य मतदारसंघ सुटण्याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक