शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

इंटरनेट बँकिंगचा वापर वाढला

By admin | Updated: November 14, 2016 02:05 IST

ई-प्रणाली आत्मसात करण्याकडे कल

नाशिक : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपये चलनातून बाद केल्यानंतर देशासह शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या जवळ असणारे पैसे खात्यात जमा करण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पैसे जवळ बाळगण्यासाठी नागरिकांनी शहरातील विविध बँकांबाहेर गर्दी केल्याचे चित्र आहे.बँकेत आपल्या जवळील पैसे नवीन चलानाप्रमाणे बदलून मिळत असले तरी सुट्या पैशांअभावी मात्र नागरिकांची कुचंबणा होत आहे. ऐन वेतन मिळण्याच्या दिवसातच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. किराणा दुकानदार, दूधवाला तसेच इतर दैनंदिन खर्चासाठी पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम केंद्र तसेच बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक मोबाइलचे रिचार्ज, वीज बिलाचा भरणा, टीव्हीचे रिचार्ज, टेलिफोन बिल भरण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत असतानाच अनेक ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी इंटरनेटद्वारे भरणा करण्यास प्राधान्य दिले तर काही नागरिकांना मात्र यानिमित्ताने इंटरनेट बँकिंग किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले.बाजारपेठेत सुटे पैसेच उपलब्ध होत नसल्याने अनेक दुकानदारही सुटे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या जाचाला कंटाळून अनेक मोबाइल ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगद्वारे तसेच डेबिट कार्ड - के्रडीट कार्डचा वापर करून रखडलेले मोबाइल बिल भरले तसेच आपले मोबाइल रिचार्ज केले. वीज बिल भरणा किंवा मोबाइल बिल भरणाप्रमाणे अनेक पेट्रोलपंपांवरही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरणा करण्यात येत होता. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक वर्गालादेखील सुट्या पैशांच्या अभूतपूर्व चणचणीमुळे ज्या दुकानांमध्ये बँकेचे कार्ड व्यवहारासाठी स्वीकारले जात होते अशा दुकानांमध्ये खरेदी करावी लागत होती. ई-व्यवहाराचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे आणि यामुळेच भविष्यात ‘कॅश लेस’ व्यवहार करणेदेखील सोयीचे होणार आहे. (प्रतिनिधी)