शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

ग्रामीण कारागिरांना मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:33 IST

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. 

ठळक मुद्देग्रामीण कारागिर, उत्पादकांच्या वस्तुंचे प्रदर्शनजिल्हा खादी व ग्रामोद्याग मंडळाचा उपक्रम डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे  पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत तीन दिवशीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील कारगीर आणि लघु उद्योजक यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी म्हणून, महाजी गांधीजींच्या विचारानुसार ग्रामीण भागातील लोक समृद्ध व्हावे हा या प्रदर्शना मागाचा हेतून असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांचे निर्यातक्षम उत्पादन वितरकांमार्फत थेट निर्यात केले जाणार असून उत्पादकांना ४५  दिवसांच्या आत त्यांच्या मालाची किंमत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात संबधित वितरक ग्रामीण कारागिरांच्या वस्तु उद्योजकाच्या घरी येवून त्याच्या निकषात त्या बसल्यास घेवून जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण उत्पादकांच्या वाहतूक खर्चातही बचत होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामोद्योग आधिकारी सिताराम दळवी यांनी प्रास्तविक केले. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप  उपस्थित होते. 

३२ स्टॉलधारकांचा समावेश महात्मा गाधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करणाºया ३२ स्टॉल धारकांनी सहभाग घेतला आहे. यात ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांचा समावेश आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकKhadiखादीMarketबाजार