शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कारागिरांना मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:33 IST

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. 

ठळक मुद्देग्रामीण कारागिर, उत्पादकांच्या वस्तुंचे प्रदर्शनजिल्हा खादी व ग्रामोद्याग मंडळाचा उपक्रम डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे  पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत तीन दिवशीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील कारगीर आणि लघु उद्योजक यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी म्हणून, महाजी गांधीजींच्या विचारानुसार ग्रामीण भागातील लोक समृद्ध व्हावे हा या प्रदर्शना मागाचा हेतून असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांचे निर्यातक्षम उत्पादन वितरकांमार्फत थेट निर्यात केले जाणार असून उत्पादकांना ४५  दिवसांच्या आत त्यांच्या मालाची किंमत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात संबधित वितरक ग्रामीण कारागिरांच्या वस्तु उद्योजकाच्या घरी येवून त्याच्या निकषात त्या बसल्यास घेवून जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण उत्पादकांच्या वाहतूक खर्चातही बचत होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामोद्योग आधिकारी सिताराम दळवी यांनी प्रास्तविक केले. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप  उपस्थित होते. 

३२ स्टॉलधारकांचा समावेश महात्मा गाधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करणाºया ३२ स्टॉल धारकांनी सहभाग घेतला आहे. यात ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांचा समावेश आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकKhadiखादीMarketबाजार