शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

आंतरजिल्हा बदल्यांप्रश्नी मंत्र्यांनी घातले लक्ष

By admin | Updated: August 20, 2016 00:41 IST

२४ आॅगस्टला मंत्रालयात बैठक

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता थेट ग्रामविकास राज्यमंत्र्यांनीच आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमध्ये लक्ष घातल्याचे वृत्त आहे.येत्या २४ आॅगस्ट रोजी मुंबईला मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमधील काही प्रकरणात झालेल्या अनियमितता संदर्भात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांच्या २०१४ मध्येच नाशिक जिल्ह्णात बदल्या झाल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यानच्या काळात २०१५ च्या एका शासन निर्णयानुसार नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण संवर्गासह अनुसूचित जाती व भटक्या जाती जमातीतील संवर्गातील जवळपास २२०० शिक्षक ्रअतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे यंदांच्या शिक्षक बदल्यांमध्ये ९६ आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांचे प्रस्ताव नाशिाक जिल्हा परिषदेने रद्द केले. त्यातील फक्त दोन अपंग शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांना मान्यता देण्यात आली. त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेकडून नाशिक जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या सुमारे ५० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या यंदा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठीच आता या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी २४ आॅगस्टला मंत्रालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित शिक्षकांची बैठक बोलविल्याचे कळते. (प्रतिनिधी)