शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदल्यांप्रश्नी मंत्र्यांनी घातले लक्ष

By admin | Updated: August 20, 2016 00:41 IST

२४ आॅगस्टला मंत्रालयात बैठक

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता थेट ग्रामविकास राज्यमंत्र्यांनीच आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमध्ये लक्ष घातल्याचे वृत्त आहे.येत्या २४ आॅगस्ट रोजी मुंबईला मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमधील काही प्रकरणात झालेल्या अनियमितता संदर्भात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांच्या २०१४ मध्येच नाशिक जिल्ह्णात बदल्या झाल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यानच्या काळात २०१५ च्या एका शासन निर्णयानुसार नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण संवर्गासह अनुसूचित जाती व भटक्या जाती जमातीतील संवर्गातील जवळपास २२०० शिक्षक ्रअतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे यंदांच्या शिक्षक बदल्यांमध्ये ९६ आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांचे प्रस्ताव नाशिाक जिल्हा परिषदेने रद्द केले. त्यातील फक्त दोन अपंग शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांना मान्यता देण्यात आली. त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेकडून नाशिक जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या सुमारे ५० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या यंदा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठीच आता या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी २४ आॅगस्टला मंत्रालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित शिक्षकांची बैठक बोलविल्याचे कळते. (प्रतिनिधी)