शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘सुखोई’ग्रस्त शेतीचे फेरपंचनामे करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST

नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा ठरविण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांना फेरपंचनाम्याची सूचना करण्यात करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्यासाठी एचएएलची संमती आवश्यक आहे.

ठळक मुद्देघोषणा होऊनही कार्यवाही नाही : भरपाईपासून वंचित

नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा ठरविण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांना फेरपंचनाम्याची सूचना करण्यात करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्यासाठी एचएएलची संमती आवश्यक आहे.एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अपघातग्रस्त विमानाचे अवशेष इस्तत: विखुरले होते. या घटनेचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला असता, साधारणत: पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कृषी सहायक व तलाठ्यांनी दिलेल्या या अहवालाशी खुद्द जिल्हा प्रशासनानेच असहमती दर्शवित इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकत नसल्याचे प्रतिकूल मत नोंदवून फेरपंचनाम्याचे आदेश दिले होते. शिवाय नैसर्गिक आपत्तीत वा शासनाने घोषित केलेल्या प्रकरणातच पीक नुकसानीच्या भरपाईची तरतूद असल्यामुळे विमान दुर्घटनेतील शेतकºयांना नुकसान कशाच्या आधारे द्यावे, असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाने आपले अंग झटकले होत. तथापि, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार छगन भुजबळ यांनी सदरचा प्रश्न उपस्थित करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदतीची मागणी केल्याने याप्रश्नी वाचा फुटली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार व एचएएल दोन्ही मिळून शेतकºयांना मदत करतील, अशी घोषणा केली. दुर्घटनेला सव्वादोन महिने तर शासनाच्या घोेषणेलाही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप शेतकºयांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. पॉवर ग्रीडच्या टॉवर उभारणी दरम्यान शेतकºयांना ज्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आले, त्या धर्तीवर सुखोईग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यायची असल्यास त्यासाठी अगोदर एचएएलची संमतीची गरज असून, अद्यापही एचएएलने तशी संमती दिलेली नाही. शेतकरी आशा बाळगूनपॉवर ग्रीडच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्यासूचना जिल्हा प्रशासनाने कृषी खात्याला दिल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात यावर कार्यवाही होईल, अशी अपेक्षाशेतकरी बाळगून आहेत.