शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना

By admin | Updated: August 12, 2016 22:45 IST

जे.पी. गावित : कळवण येथे आढावा बैठक; गडावरील रस्त्याच्या कामाला प्रारंभ

 कळवण : तालुक्यात अतिवृष्टीने बाधित होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात आमदार जे. पी. गावित यांनी आढावा बैठक घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात गावित यांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तालुक्यात मागील आठ दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, कालवे तसेच मका, भात, टमाटे, मिरची आदि शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. याबाबत आमदार गावित यांनी आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यात अतिवृष्टीने ज्यांची लहान-मोठी जनावरे मयत झालेली आहेत त्यांना तीन ते चार दिवसात मदत केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी दिले. घरांची पडझड झाली असेल तर त्यांनाही १३ मे २०१५च्या शासन निर्णयानुसार त्वरित मदत केली जाणार असल्याचे यावेळी तहसीलदार चावडे यांनी सांगितले.शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असल्यास कृषी व तहसील विभागामार्फत शासन निर्णयानुसार पंचनामे करणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचनामे करण्यास तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्यास त्याबद्दल त्वरित तहसील कार्यालयात तक्रार करण्याच्या सूचना यावेळी आमदार गावित यांनी दिल्या. भौती ते पुनंदनगर दरम्यानचा रस्ता खचून गेल्याने त्या रस्त्यास तीन-चार फुटांची खटकी पडल्याने वाहतूक बंद आहे. डोंगराचा भाग असल्याने मुरूम वाहून जात असून, बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले गेल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. पाहणी दौऱ्यात तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र चव्हाण, कृषी सहायक किशोर भरते, वनविभागाचे आढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सपकाळे, हेमंत पाटील, भरत शिंदे, संतोष देशमुख, सावळीराम पवार, बाळासाहेब गांगुर्डे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)