शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

‘नार-पार’ची भामरेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:57 IST

मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.डॉ. भामरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व वांजुळपाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नार-पार खोºयाचा दौरा केला. नार-पार-अंबिका-औरंगा, नार-पार-ताण-मान नद्यांच्या जल स्रोतांची व उगमस्थानांची पाहणी केली. सुमारे ५ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. गेल्या काही वर्षांपासून नार-पार-दमण-गंगा-वांजुळपाडा, मांजरपाड्याचा पाणीप्रश्न कसमादे परिसरात पेटला आहे. कसमादेसह उत्तर महाराष्टÑाच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी शेतकरी आंदोलने करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वांजुळपाडा संघर्ष समितीने गेल्या आठ महिन्यांपासून कसमादे परिसरात जनजागृती सुरू केली आहे.भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली होती. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची भेट घेऊन प्रकल्प स्थळाविषयीमाहिती दिली होती. याची दखल घेत भामरे यांनी दौरा केला. सुरगाणा तालुक्यातील गिरणा नदीच्या उगमस्थानावर तसेच केम डोंगरावरील वांजुळपाणी योजनेच्या मुख्य ठिकाणाला अधीक्षक अभियंता एम. एस. आमले, कार्यकारी अभियंता पी. व्ही. मुसळे, उपअभियंता काकुळते आदी अधिकाºयांसह दौरा केला.यावेळी वांजुळपाणी येथे धरण बांधल्यास नैसर्गिक उताराने प्रवाही वळण पद्धतीने बोगदे व पाटचारीच्या माध्यमातून औरंगा-नार-पार-ताण-मान खोºयातील पाणी धरणात सोडता येईल. ५ टीएमसी पाणी याद्वारे उपलब्ध होऊन ते गिरणा नदीत सोडता येईल. तसेच गिरणा खोºयाचा पाणीप्रश्न निकाली निघेल, अशा आशयाचे निवेदन संघर्ष समितीने डॉ. भामरे यांना दिले.या दौºयात भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष गायकवाड, माजी जि.प. सदस्य रत्नाकर पवार, लकी गिल, जि.प. सदस्य समाधान हिरे, नीलेश कचवे, सुरेश निकम, डॉ. विलासबच्छाव, जळगाव जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, मच्छिंद्र पाटील, विवेक वारुळे, संदीप पाटील, प्रा. के. एन. अहिरे, प्रशांत पाटील, भडगाव कृउबाचे सभापती विश्वास पाटील, राजेंद्र शेलार, उमाकांत कदम आदींसह वांजुळपाडा संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.अल्पखर्चासाठी पाठपुरावातांत्रिकदृष्ट्या सोयीस्कर व अल्पखर्चाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नार-पारसाठी निधी मिळवून या प्रकल्पाला मूर्त रूप दिले जाईल, अशी ग्वाही डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थितांना दिली.

टॅग्स :Damधरण