शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:12 IST

सिन्नर : तालुक्यात जनावरांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चारा व दुष्काळी भागात टॅँकरने होणाºया पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी शनिवार (दि.११) रोजी केला.

तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी दौºयात सहभागी झाले होते. दौ-यात त्यांनी टंचाईची परिस्थिती, टॅँकर भरण्याचे स्त्रोत, चारा उपलब्धता यांचा त्यांनी आढावा घेतला. दाखल झालेल्या प्रस्तावांनुसार तीन गावांमध्ये जनावरांसाठी टॅँकरच्या अतिरीक्त खेपा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी पठारे, तहसीलदार कोताडे यांनी दिली. आडवाडी, गुळवंच व खापराळे येथे चारा छावण्यासाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठविण्यात आले असून गोंदे व दोडी बुद्रुक येथील संस्थांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. माळेगाव एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट देवून टॅँकर भरण्याची पध्दत, जलशुध्दीकरण प्रक्रिया आणि पाण्याचे प्रमाण याची त्यांनी माहिती घेतली. त्यानतंर सोनेवाडी येथे भोजापूर धरणातील पाणीसाठा तसेच मनेगावसह १६ गावांची पाणीयोजना तसेच चास, नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, म-हळ खुर्द, फुलेनगर येथे पंचायत समितीमार्फत पाणीपुरवठा करणाºया टॅँकरची तपासणी करण्यात आली. खेपा आणि पुरवठ्याचे प्रमाण समाधानकारक आढळून आल्याचे तहसीलदार कोताडे यांनी सांगितले. तालुक्यात २३ गावे, २७४ वाड्या-वस्त्यांना अशा २९७ गावांमध्ये ५६ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच सुळेवाडी, लक्ष्मणपूर, खडांगळी, मनेगाव, जामगाव, मलढोण येथील सहा प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झालेआहेत. प्रस्तावाची पडताळणी करून टॅँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. टॅँकर मंजूर गावांना १५७ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात ५० खासगी व सहा सरकारी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, सर्व टॅँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तालुक्यात पशुधन संख्या लक्षात घेवून प्रशासनाने जनावरांनादेखील टॅँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पशुपालकांनी पालकमंत्री महाजन यांच्या दौ-यात केली होती. तथापि, पशुधन संख्या व आवश्यक पाणी विचारात घेवून सध्या पशुधनासाठी २५ गावांमध्ये एक खेप याप्रमाणे १० अतिरिक्त टॅँकरद्वारे २५ खेपा सुरू करण्याची गरज असल्याचे प्रांत, तहसीलदार व पंचायत समितीच्या समिती अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ