शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:12 IST

सिन्नर : तालुक्यात जनावरांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चारा व दुष्काळी भागात टॅँकरने होणाºया पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी शनिवार (दि.११) रोजी केला.

तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी दौºयात सहभागी झाले होते. दौ-यात त्यांनी टंचाईची परिस्थिती, टॅँकर भरण्याचे स्त्रोत, चारा उपलब्धता यांचा त्यांनी आढावा घेतला. दाखल झालेल्या प्रस्तावांनुसार तीन गावांमध्ये जनावरांसाठी टॅँकरच्या अतिरीक्त खेपा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी पठारे, तहसीलदार कोताडे यांनी दिली. आडवाडी, गुळवंच व खापराळे येथे चारा छावण्यासाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठविण्यात आले असून गोंदे व दोडी बुद्रुक येथील संस्थांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. माळेगाव एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट देवून टॅँकर भरण्याची पध्दत, जलशुध्दीकरण प्रक्रिया आणि पाण्याचे प्रमाण याची त्यांनी माहिती घेतली. त्यानतंर सोनेवाडी येथे भोजापूर धरणातील पाणीसाठा तसेच मनेगावसह १६ गावांची पाणीयोजना तसेच चास, नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, म-हळ खुर्द, फुलेनगर येथे पंचायत समितीमार्फत पाणीपुरवठा करणाºया टॅँकरची तपासणी करण्यात आली. खेपा आणि पुरवठ्याचे प्रमाण समाधानकारक आढळून आल्याचे तहसीलदार कोताडे यांनी सांगितले. तालुक्यात २३ गावे, २७४ वाड्या-वस्त्यांना अशा २९७ गावांमध्ये ५६ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच सुळेवाडी, लक्ष्मणपूर, खडांगळी, मनेगाव, जामगाव, मलढोण येथील सहा प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झालेआहेत. प्रस्तावाची पडताळणी करून टॅँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. टॅँकर मंजूर गावांना १५७ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात ५० खासगी व सहा सरकारी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, सर्व टॅँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तालुक्यात पशुधन संख्या लक्षात घेवून प्रशासनाने जनावरांनादेखील टॅँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पशुपालकांनी पालकमंत्री महाजन यांच्या दौ-यात केली होती. तथापि, पशुधन संख्या व आवश्यक पाणी विचारात घेवून सध्या पशुधनासाठी २५ गावांमध्ये एक खेप याप्रमाणे १० अतिरिक्त टॅँकरद्वारे २५ खेपा सुरू करण्याची गरज असल्याचे प्रांत, तहसीलदार व पंचायत समितीच्या समिती अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ