शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

जिल्ह्यात कांदा लागला सडू शेतकरी

By admin | Updated: August 6, 2016 22:43 IST

संतप्त : शासन-व्यापाऱ्यांच्या भांडणात होरपळ

दत्ता दिघोळे  नायगावशासनाच्या नियमनमुक्ती व व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांचा बंद व चालूच्या लपाझपीच्या खेळामुळे नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी साठवलेला हजारो क्विंटल कांदा सडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शासन व व्यापाऱ्यांच्या वादात बळीराजा भरडला जात आहे. वाढत्या महागाईला आळा बसावा व उत्पादन खर्चातून (अडतीच्या) शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या पचनी पडला नाही. अनेक दिवस व्यापारीवर्गाने बंदची हाक देत बंद पुकारला, तर शासनाने शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत व्यापाऱ्यांनी समोरच्या खरेदीदारांकडून वसूल करावी, असा नियम रुजू करण्याची धोरणे (नियम) आखल्याने गेल्या काही दिवसांपासून कांदा मार्केट बंद पडल्याने तीन-चार महिन्यांपासून चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शासन व व्यापारीवर्ग यांच्यातील तिढा सुटण्याचा कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताच बाजार समित्या सुरु झाल्या. मात्र, लिलावासाठी कांदा गोणीत भरून आणण्याचा नवीन फंडा व्यापाऱ्यांनी शोधून काढून शेतकऱ्यांना कात्रीत पकडून शासनाच्या नियमांना वेगळ्या मार्गाने खो घातला आहे. आधीच बाजार समित्या बंद-चालूच्या खेळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर गोण्यांचे मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना चार-पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा सध्या जागेवरच सडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. नायगाव खोऱ्यातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी या परिसरातील हजारो क्विंटल कांदा सडल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांची अडतीमधून सुटका होण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय समाधानकारक असला तरी व्यापाऱ्यांच्या गोणी पद्धतीने तो शेतकऱ्यांना अडचणीचा व खर्चिक असल्याने या निर्णयाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलने केली. तथापि, त्याची व्यापारी व शासनाने दखल तर घेतलीच नाहीच; उलट या प्रश्नावर राजकारण सुरू केल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खोऱ्यातील शेकडो शेतकऱ्यांनी चाळीत सडलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याचा सपाटा लावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र बनल्या असल्याने शासनाने हकनाक या अडतीचा गोंधळ घातल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच व्यापाऱ्यांच्या आडमुठ्यापणामुळे शेतकरी अधिकच संतापला आहे. सततच्या मातीमोल भावामुळे आर्थिक अडचणीत सापडत असलेला शेतकरी यंदा शासन व व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अधिक अंत न बघता लवकरात लवकर तोडगा काढून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. साठवलेला कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली जात आहे. सध्या शेतकरी चारही बाजूने अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे सर्वच राजकीय नेते मात्र सध्याच्या परिस्थितीबाबत का बोलत नाही तसेच विविध चॅनेलवाले याकडे लक्ष का देत नाही व बळीराजाला मदत का करत नाहीत, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे.