शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व उडीद या पिकांवर मोठ्या प्रमाणात तांबेरा, करपा व टाके रोग पडला असून उडीद या पिकावर मोठे किडे व अळी दिसून येत आहे. त्यामुळे येथील परिसरातील शेतकरी हे चिंतातुर झाले आहेत.

या वर्षी एक तर पाऊस उशिरा पडला. त्यानंतर पुन्हा उघड व नंतर खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार व अधूनमधून पुन्हा उघडझाप यामुळे केवळ खरीप पिकावर येथील शेतकरी अवलंबून असल्याने या वर्षी आपल्या हातात काही लागणार नाही म्हणून बहुतेक खेडेगावांतील लोकांनी आतापासून आपला बाडबिस्तरा आवरून मजुरीसाठी शहराचा मार्ग धरला आहे.

त्र्यंबक तालुक्याला रोजगारासाठी स्थलांतराचा शाप आहे. मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या आणि वातावरणाच्या बदलामुळे येथील शेतकरी आता हळूहळू आपली पारंपरिक शेती कमी करू लागला असून पाच-दहा वर्षांपूर्वी नागलीसारख्या पिकाला तो दैवत (कंसरी) समजून पूर्ण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे पीक आता दिवसेंदिवस फारच दुर्मीळ झाले आहे.

अलीकडच्या काळात नागली पिकावर सतत किडीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव व आदिवासी समाजातील कमी होणारी गायीगुरे आणि सध्या वापरात येणारी रासायनिक खते यामुळे नागलीसारख्या पिकाला आतापासून धोका निर्माण झाल्याने ज्या क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे, त्यावरही रोग दिसून येत आहे.

४-५ वर्षांपूर्वी भाताचे जेवढे क्षेत्र वाहतीसाठी वापरण्यात येत होते, तेवढ्याच क्षेत्रात नागली करण्यात येत होती. आता भारताच्या निम्म्या क्षेत्रावरच नागली करण्यात येत आहे. मुळातच कोरडवाहू शेतीसाठी अगदी भाजणी, नांगरणी, राब कोळपणी व अन्य मशागत यामुळे आपले पोट भरण्यापुरते का होईना शेती करणारा हा शेतकरी आता शहराकडे आकर्षित होऊ लागला असून या बाबत पुढील काळ हा चिंताजनक आहे, असे बोलले जात आहे.

परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग यांच्याकडे कीड नियंत्रण औषधे यांची मागणी पळशी येथील माजी सरपंच वामन कुंभार, दौलत खोटरे, कृष्णा खोकरे, प्रकाश कुंभार, काशिनाथ वाघले, शंकर कुंभार आदी ग्रामस्थ आदींनी केली आहे.

कोट...

हरसूल व पेठ तालुक्यांतील आमचा परिसर हा डोंगरउताराचा असून आमचे मुख्य पीक म्हणजे नागली, भात, वरई व डाळीसाठी उडीद हे पीक परंतु अलीकडच्या काळात आम्ही सतत येणारी रोगराई यामुळे आमच्या परिसरात काही असे शेतकरी होते की, ते या माळरानावर पन्नास ते शंभर पोते नागली पिकवणाऱ्या शेतकऱ्याला नागलीची भाकर मिळत नाही. उलट मोलमजुरी करून बाजरी, गहू विकत आणून खावे लागतात. तर, उडीद आम्ही आमच्यासाठी पुरेसे ठेवून बाकी आम्ही विकत होतो. या वर्षी आम्हीच विकलेले उडीद शंभर रुपये किलो दराने विकत घेऊन खातोय. ही अतिशय खेदजनक बाब आहे.

- रमेश ठाकरे, शेतकरी, पळशी बु॥

(२२ टीबीके)

220921\22nsk_31_22092021_13.jpg

भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव.