शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व उडीद या पिकांवर मोठ्या प्रमाणात तांबेरा, करपा व टाके रोग पडला असून उडीद या पिकावर मोठे किडे व अळी दिसून येत आहे. त्यामुळे येथील परिसरातील शेतकरी हे चिंतातुर झाले आहेत.

या वर्षी एक तर पाऊस उशिरा पडला. त्यानंतर पुन्हा उघड व नंतर खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार व अधूनमधून पुन्हा उघडझाप यामुळे केवळ खरीप पिकावर येथील शेतकरी अवलंबून असल्याने या वर्षी आपल्या हातात काही लागणार नाही म्हणून बहुतेक खेडेगावांतील लोकांनी आतापासून आपला बाडबिस्तरा आवरून मजुरीसाठी शहराचा मार्ग धरला आहे.

त्र्यंबक तालुक्याला रोजगारासाठी स्थलांतराचा शाप आहे. मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या आणि वातावरणाच्या बदलामुळे येथील शेतकरी आता हळूहळू आपली पारंपरिक शेती कमी करू लागला असून पाच-दहा वर्षांपूर्वी नागलीसारख्या पिकाला तो दैवत (कंसरी) समजून पूर्ण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे पीक आता दिवसेंदिवस फारच दुर्मीळ झाले आहे.

अलीकडच्या काळात नागली पिकावर सतत किडीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव व आदिवासी समाजातील कमी होणारी गायीगुरे आणि सध्या वापरात येणारी रासायनिक खते यामुळे नागलीसारख्या पिकाला आतापासून धोका निर्माण झाल्याने ज्या क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे, त्यावरही रोग दिसून येत आहे.

४-५ वर्षांपूर्वी भाताचे जेवढे क्षेत्र वाहतीसाठी वापरण्यात येत होते, तेवढ्याच क्षेत्रात नागली करण्यात येत होती. आता भारताच्या निम्म्या क्षेत्रावरच नागली करण्यात येत आहे. मुळातच कोरडवाहू शेतीसाठी अगदी भाजणी, नांगरणी, राब कोळपणी व अन्य मशागत यामुळे आपले पोट भरण्यापुरते का होईना शेती करणारा हा शेतकरी आता शहराकडे आकर्षित होऊ लागला असून या बाबत पुढील काळ हा चिंताजनक आहे, असे बोलले जात आहे.

परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग यांच्याकडे कीड नियंत्रण औषधे यांची मागणी पळशी येथील माजी सरपंच वामन कुंभार, दौलत खोटरे, कृष्णा खोकरे, प्रकाश कुंभार, काशिनाथ वाघले, शंकर कुंभार आदी ग्रामस्थ आदींनी केली आहे.

कोट...

हरसूल व पेठ तालुक्यांतील आमचा परिसर हा डोंगरउताराचा असून आमचे मुख्य पीक म्हणजे नागली, भात, वरई व डाळीसाठी उडीद हे पीक परंतु अलीकडच्या काळात आम्ही सतत येणारी रोगराई यामुळे आमच्या परिसरात काही असे शेतकरी होते की, ते या माळरानावर पन्नास ते शंभर पोते नागली पिकवणाऱ्या शेतकऱ्याला नागलीची भाकर मिळत नाही. उलट मोलमजुरी करून बाजरी, गहू विकत आणून खावे लागतात. तर, उडीद आम्ही आमच्यासाठी पुरेसे ठेवून बाकी आम्ही विकत होतो. या वर्षी आम्हीच विकलेले उडीद शंभर रुपये किलो दराने विकत घेऊन खातोय. ही अतिशय खेदजनक बाब आहे.

- रमेश ठाकरे, शेतकरी, पळशी बु॥

(२२ टीबीके)

220921\22nsk_31_22092021_13.jpg

भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव.