शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

उत्तर महाराष्टतील उद्योजकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:47 IST

उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकलाही सवलत कधी देणार, असा प्रश्न या निमित्ताने उद्योजकांनी केला आहे.मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात सवलत दिली आहे. अशीच सवलत नाशिकमधील उद्योजकांनाही मिळावी, अशी आग्रही मागणी गेल्या तीन वर्षांपासून उद्योजक करीत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निमा पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट घेऊन सवलतीची मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली आहे. नाशिकमधील भाजपाचे आमदारांनादेखील बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु उपयोग झालेला नाही. ही मागणी कायम असताना मंगळवारी (दि.२८) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ, मराठवाड्याला वीज दरातील सवलत पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती समजताच उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विदर्भ व मराठवाड्याला सवलत देण्यास हरकत नाही. हीच सवलत नाशिकलाही देण्यात यावी, अशी मागणी आहे. राज्यातील उद्योजकांना विजेचे दर वेगवेगळे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सापत्नभावाची वागणूक देऊ नये, अशाही भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी