शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

उत्तर महाराष्टतील उद्योजकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:47 IST

उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकलाही सवलत कधी देणार, असा प्रश्न या निमित्ताने उद्योजकांनी केला आहे.मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात सवलत दिली आहे. अशीच सवलत नाशिकमधील उद्योजकांनाही मिळावी, अशी आग्रही मागणी गेल्या तीन वर्षांपासून उद्योजक करीत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निमा पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट घेऊन सवलतीची मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली आहे. नाशिकमधील भाजपाचे आमदारांनादेखील बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु उपयोग झालेला नाही. ही मागणी कायम असताना मंगळवारी (दि.२८) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ, मराठवाड्याला वीज दरातील सवलत पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती समजताच उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विदर्भ व मराठवाड्याला सवलत देण्यास हरकत नाही. हीच सवलत नाशिकलाही देण्यात यावी, अशी मागणी आहे. राज्यातील उद्योजकांना विजेचे दर वेगवेगळे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सापत्नभावाची वागणूक देऊ नये, अशाही भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी