शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:57 IST

तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.

ठळक मुद्देपूर्व भागात ढगाळ हवामान : उत्पादन खर्चात वाढ; भाजीपाल्याची लागवड सुरू

एकलहरे : तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.एकलहरे परिसरारातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरातील शेतकरी अजूनही कांदे लागवड करताना दिसतात. अनेक ठिकाणी कांदेलागवड होऊन महिना दोन महिने झाले आहेत, अशा ठिकाणी शेतकरी पिकांना खते देणे, पाणी देणे, निंदणी करणे, द्राक्षांची खुडणी करणे आदी कामात व्यस्त आहेत. काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड सुरू असलेली दिसते. टमाटे, कोथिंबीर लागवड करून साधारण तीन आठवडे झाल्याने युरिया खत देऊन पाणी भरणे सुरू आहे. काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेली कोथिंबीर उपटून, जुड्या बांधून मार्केटला नेतात. सध्या सुमारे ७०० रु पये शेकडा कोथिंबीर व्यापारी खरेदी करतात.काही ठिकाणी भेंडी, वाल, घेवडा या वेलवर्गीय पालेभाज्या काढून मार्केटला पाठविल्या जातात. त्याबरोबरच कोबी, फ्लॉवर या भाज्याही काढून बाजारात नेल्या जातात, मात्र सध्या वाटाणा, गाजर व इतर पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोबी, फ्लॉवरच्या भावात घट झाली आहे. व्यापारी २ ते ३ रु पये कोबी, ४ ते ५ रु पये फ्लॉवर नगाप्रमाणे खरेदी करतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशीतक्रार शेतकरी करतात. सध्या वातावरणातील बदल व ढगाळ हवामानामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, थ्रीप्स या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते.गव्हाचे क्षेत्र जोमात, हरभरा जेमतेमतालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके म्हणजे गहू व हरभरा ही आहेत. यंदा अतिपावसामुळे शेतात उशिरापर्यंत ओलावा टिकून होता. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पेरणी उशिरा झाली आहे. आगाऊ पेरलेला गहू आता ओंब्यांवर आला आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी गव्हावर औषधे फवारणी सुरू आहे. हरभरा कमी प्रमाणात लागवड केलेला दिसतो. काही ठिकाणी हरभऱ्याला घाटे लागवड झालेली दिसते. पूर्व भागात पिकांना पाणी देण्यासाठी शेततळी, विहिरी खोदून पाण्याचा साठा केलेला दिसतो. दारण व गोदावरी नद्यांमध्ये हा भाग येत असल्याने शेतकऱ्यांनी नदीवरून थेट पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. हे पाणी शेततळ्यात अथवा विहिरीत साठवून ठेवले जाते व योग्यवेळी पिकांना दिले जाते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रenvironmentपर्यावरण