शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सायगावी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.

सायगाव : परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. जिल्हा अधिकारी व तालुका कृषी अधिकारी येवला यांनी कपाशी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सायगाव, ता. येवला येथे कृषी सहायक ज्ञानदेव हारदे, ग्रामसेवक प्रदीप बोडखे यांनी नुकसानग्रस्त कपाशी शेतीचे छायाचित्र मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जीपीस प्रणालीवर अपलोड करून पंचनामे सुरू केले आहे. यावेळी आधार कार्ड नंबर बँक खात्याची नोंद करण्यात येत आहे. कपाशीचे अतिशय अल्प उत्पादन निघाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी भागुनाथ उशीर यांच्या कपाशी पीक शेतावर बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुनील देशमुख, साहेबराव उशीर, अनिल देशमुख, बबन सोनवणे, सोपान लोहकरे, रमेश पठारे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मुखेडला पंचनामे करण्यास सुरुवात मुखेड परिसरात बदलते वातावरण ,सकाळी पडणारे दाट धुके यापासून होणाºया विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागडी कीटकनाशके फवारली परंतु याचा काही एक उपयोग झाला नाही.  बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मुखेड,मानोरी बुद्रुक, सत्यगाव, देशमाने येथील शेतकºयांच्या कपाशीचे पीक बोंडअळीच्या प्रादुर्भावाने प्रदूषित झाल्याचं शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.४प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुखेड येथेही पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे, कृषी सहायक आर. ई. कुºहाडे, सरपंच धनंजय आहेर, ग्रामसेवक जी.एल. गायकवाड तसेच शेतकरी उपस्थित होते. कपाशी पिकाला केलेली मेहनत व्यर्थयेवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, कपाशी पिकाला केलेली सर्व मेहनत व्यर्थ गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सततचे बदलत असलेले वातावरण आणि सकाळी पडणाºया दाट धुक्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला होता. वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही काही एक उपयोग होत नसल्याने तोंडचा आलेला घास पळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. महसूल विभागाला तातडीने बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. उसनवारी करून घेतलेले भांडवल कशाच्या आधारावर परत करायचे फेडायचे ? हा गंभीर प्रश्न सध्या शेतक ºयांसमोर उभा राहिला आहे. यावेळी कृषी सहायक श्रीमती तागड, ग्रामसेवक मच्छिंद्र देशमुख, ईश्वर ढमाले, प्रवीण सोनवणे, हरीश ठाकरे, राजेंद्र कोटमे, सुरेश कोटमे आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाच्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे बोंडअळीच्या पंचनाम्याचे काम संथगतीने सुरू असून, शेतकरी गोंधळात सापडला आहे. शासनाने पंचनाम्यासाठी कर्मचारी वाढवावे व शेतकºयांना दिलासा द्यावा.- भागुनाथ उशीर, चेअरमन, येवला तालुका खरेदी-विक्र ी संघ, येवला

टॅग्स :Nashikनाशिकcottonकापूस