शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

सायगावी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.

सायगाव : परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. जिल्हा अधिकारी व तालुका कृषी अधिकारी येवला यांनी कपाशी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सायगाव, ता. येवला येथे कृषी सहायक ज्ञानदेव हारदे, ग्रामसेवक प्रदीप बोडखे यांनी नुकसानग्रस्त कपाशी शेतीचे छायाचित्र मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जीपीस प्रणालीवर अपलोड करून पंचनामे सुरू केले आहे. यावेळी आधार कार्ड नंबर बँक खात्याची नोंद करण्यात येत आहे. कपाशीचे अतिशय अल्प उत्पादन निघाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी भागुनाथ उशीर यांच्या कपाशी पीक शेतावर बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुनील देशमुख, साहेबराव उशीर, अनिल देशमुख, बबन सोनवणे, सोपान लोहकरे, रमेश पठारे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मुखेडला पंचनामे करण्यास सुरुवात मुखेड परिसरात बदलते वातावरण ,सकाळी पडणारे दाट धुके यापासून होणाºया विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागडी कीटकनाशके फवारली परंतु याचा काही एक उपयोग झाला नाही.  बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मुखेड,मानोरी बुद्रुक, सत्यगाव, देशमाने येथील शेतकºयांच्या कपाशीचे पीक बोंडअळीच्या प्रादुर्भावाने प्रदूषित झाल्याचं शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.४प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुखेड येथेही पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे, कृषी सहायक आर. ई. कुºहाडे, सरपंच धनंजय आहेर, ग्रामसेवक जी.एल. गायकवाड तसेच शेतकरी उपस्थित होते. कपाशी पिकाला केलेली मेहनत व्यर्थयेवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, कपाशी पिकाला केलेली सर्व मेहनत व्यर्थ गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सततचे बदलत असलेले वातावरण आणि सकाळी पडणाºया दाट धुक्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला होता. वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही काही एक उपयोग होत नसल्याने तोंडचा आलेला घास पळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. महसूल विभागाला तातडीने बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. उसनवारी करून घेतलेले भांडवल कशाच्या आधारावर परत करायचे फेडायचे ? हा गंभीर प्रश्न सध्या शेतक ºयांसमोर उभा राहिला आहे. यावेळी कृषी सहायक श्रीमती तागड, ग्रामसेवक मच्छिंद्र देशमुख, ईश्वर ढमाले, प्रवीण सोनवणे, हरीश ठाकरे, राजेंद्र कोटमे, सुरेश कोटमे आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाच्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे बोंडअळीच्या पंचनाम्याचे काम संथगतीने सुरू असून, शेतकरी गोंधळात सापडला आहे. शासनाने पंचनाम्यासाठी कर्मचारी वाढवावे व शेतकºयांना दिलासा द्यावा.- भागुनाथ उशीर, चेअरमन, येवला तालुका खरेदी-विक्र ी संघ, येवला

टॅग्स :Nashikनाशिकcottonकापूस