शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भगूर परिसरात मक्यावर ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:14 IST

नाशिक तालुक्यातील विविध गावांत शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या मक्याचे कणसावर लष्करी अळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामुळे मक्याचे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, शासनाने चौकशी करून बियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी राहुरीचे सरपंच संगीता संपत घुगे यांनी केली आहे.

भगूर : नाशिक तालुक्यातील विविध गावांत शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या मक्याचे कणसावर लष्करी अळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामुळे मक्याचे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, शासनाने चौकशी करून बियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी राहुरीचे सरपंच संगीता संपत घुगे यांनी केली आहे.तालुक्यातील भगूरजवळील राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, लहवित, विंचुरी दळवी, आगसखिंड, पांढुर्ली, वंजारवाडी, शेनित, बेलू, नानेगाव या भागात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली असून, दरवर्षी मुंबई, गुजरात मक्याची निर्यात होऊन शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते.या संदर्भात काही शेतकºयांनी बियाणे विक्री दुकानदाराला विचारणा केली असता त्याने यावर्षी जास्त उष्णतेमुळे हा रोग झाल्याचे सांगून त्यास कंपनी जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. शेतकºयांनी मात्र सिजंटा कंपनीच्या बोगस शुगर ७५ बियाण्यांमुळे नुकसान झाल्याची तक्रार केली असून, शासनाने बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संपत घुगे, भिकाजी करंजकर, सुभाष वाघ, संदीप मुठाळ, सोपान रोकडे, पोपट भवार, बहिरू शेळके, संदीप आडके, बाळू ढुबे, दिनकर अहेर, संतोष जुंद्रे, महेंद्र बर्वे, बाळू शिरोळे, नाना शिंदे, यशवंत गायकवाड यांनी केली आहे.केवळ तीन कणसेयंदा शेतकºयांनी सिजंटा कंपनीचे शुगर ७५ या औषधाची फवारणी केली. परंतु बियाण्यात दोष असल्या कारणाने एका झाडाला तीन कणसे आली. मात्र ती भरली नाहीत. उलट झाडाला मोठ्या प्रमाणात लष्करी अळीने वेढले. एक किलो बियाणे पेरणीवर ९० कट्टे मका होत असे ते आता अळीयुक्त ३५ कट्टे होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती