शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मक्यावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 16:58 IST

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : आठवडाभरापासून पाऊस न पडल्याने पिकांवर परिणाम

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.येथील रानमळा शिवारातील दीपक बाजीराव अहिरे यांच्या शेतात मका पिकाची लागवड केली असून त्यांच्या मका पिकावर तसेच परिसरातील शेतातील पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे. अळी जाण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधे मारली असली तरी, अळी जाण्यासाठी मोठा पाऊसच गरजेचा असल्याचे मका उत्पादक शेतकरी दीपक अहिरे यांनी सांगितले. मका पिकाबरोबरच सोयाबीन, ताग, कोबी, टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांवर अळीने घात केला असून त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त बनला आहे.वातावरणातील उष्म्यात वाढगेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले असून अद्याप मोठा पाऊस न पडल्याने काही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळीही घटू लागली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. श्रावण महिन्यात पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शेतात महागडी बियाणे, खते, महागडी औषधे, मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. या अळीमुळे आर्थिक संकट उभे राहिल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.शेतकऱ्यांनी मका पिकावरील अळीला घालवण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली आहेत. मात्र अद्याप त्याचा परिणाम दिसून येत नाही. आता त्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.- दीपक अहिरे, मका उत्पादक, ब्राम्हणगाव 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती