शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
2
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
3
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
4
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
5
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
6
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
7
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
8
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
9
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
10
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
11
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
12
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
13
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
14
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
15
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
16
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
17
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
18
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
19
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
20
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
Daily Top 2Weekly Top 5

लागण गॅस्ट्रोची; मृत्यूबाबत निष्कर्ष भलताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:34 IST

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ते पिल्याने गावात गॅस्ट्रोची लागण झालेली असली तरी, गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक झालेले चारही मृत्यू मात्र गॅस्ट्रोमुळे नव्हे तर अन्य कारणांनी झाल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  विशेष म्हणजे गॅस्ट्रोची लागण होण्यास स्थानिक ग्रामपंचायतच कारणीभूत असल्याचा ठपकाही आरोग्य विभागाने आपल्या अहवालात नोंदविला आहे.

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ते पिल्याने गावात गॅस्ट्रोची लागण झालेली असली तरी, गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक झालेले चारही मृत्यू मात्र गॅस्ट्रोमुळे नव्हे तर अन्य कारणांनी झाल्याचानिष्कर्ष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  विशेष म्हणजे गॅस्ट्रोची लागण होण्यास स्थानिक ग्रामपंचायतच कारणीभूत असल्याचा ठपकाही आरोग्य विभागाने आपल्या अहवालात नोंदविला आहे.सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे ८ जुलै रोजी दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण होऊन ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने बोरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलविण्यात आले. गावाच्या ८५० लोकसंख्येतील १८६ जणांना त्याची लागण होऊन प्रकृती गंभीर झाल्याने त्यातील नामदेव मोतीराम गांगुर्डे (५५), बशिºया पांडू लिलके (६५), सीताराम जिवा पिठे (७५) व नवसू बाळू पवार (६५) या चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली असून, सदर घटनेची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत या साºया गोष्टीचे खापर ग्रामपंचायतीवर फोडण्यात आले असून, या संदर्भात शासनाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, दि. ६ व ७ जुलै रोजी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने गावाला पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरीच्या बाजूने वाहणाºया नाल्याचे पाणी कथड्याच्या छिद्रावाटे विहिरीत गेल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले व ते पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र या साºया गोष्टीस ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारी टीसीएल पावडर हवाबंद न ठेवता उघड्यावरच ठेवलेली असल्याचेही या चौकशीत आढळून आले असून, १ जूनपूर्वी पाणी तपासणीच्या केलेल्या नोंदी ठेवणारी वही गायब असल्याचे तसेच टीसीएल खरेदीच्या नोंदीदेखील नव्याने भरलेल्या असल्याचे अहवालात नमूद केले आहे. टीसीएलचे नमुने तपासण्यासाठी दिलेले नसल्याचे तसेच सार्वजनिक विहिरीचे पाणी शुद्धीकरण करण्याचे कार्य अनियमित असल्याचा ठपकाही ग्रामपंचायतीवर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य