शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भावली भागात  इंद्रपुरी उभी करणार -  जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:47 IST

निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा, यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येऊन हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इगतपुरी : निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा, यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येऊन हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केले.  इगतपुरी तालुक्यातील भावली धरण भागात मंगळवारी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शेकडो उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. इगतपुरी येथील महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इगतपुरी सिटिझन्स फोरम यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, इगतपुरी सिटिझन्स फोरम, व महिंद्रा यांच्या सहकार्याने पर्यटन विभाग भावली भागात इंद्रपुरी उभी करणार आहे. भावली भागात उपयुक्त वृक्ष लावून इगतपुरी सिटिझन्स फोरमच्या युवकांकडून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आशुतोष राठोड, समृद्धी महामार्ग उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, जलसंपदा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, प्रमोद कुलकर्णी, महिंद्रा इगतपुरीचे विजय कालरा, हिरामण आहेर आदी उपस्थित होते.  आगामी काळात भावली परिसरात फिरती स्वच्छता गृह त्याचबरोबर ठिकठिकाणी चेंजिग रूम केल्या जातील. पर्यटनाला कृषीची जोड देऊन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती केली जाईल. बोटिंग क्लब, वेलनेस सेंटर, रोप वे, पॅरोसिलिंग ,पॅराग्लायडिंग यासारख्या सुविधा देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे अश्वासन पर्यटनमंत्री रावल यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावल