शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पेटंट कायद्यातील बदलासाठी भारतावर दबाव

By admin | Updated: July 17, 2017 00:18 IST

नाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर गदारोळ माजवत असून, वादग्रस्त तरतुदी काढण्यासाठी भारतावर दबाव वाढत आहे. या दबावाला बळी पडून लोकोपयोगी तरतुदी हटविल्यास भारतच नव्हे तर तिसऱ्या जगातील देशांसमोर औषधांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत बौद्धिक संपदातज्ज्ञ मृदुला बेळे यांनी व्यक्त केले.  दवप्रभा फिल्म अ‍ॅन्ड प्रॉडक्शनच्या वतीने झेप सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मृदुला बेळे यांनी तिसरे पुष्प ‘कथा औषध आणि पेटंटची’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पेटंटचा इतिहास आणि तो मंजूर करण्याची पद्धत या विषयावर सखोल विवेचन केले.स्वतंत्र भारताने पेटंट धोरणासाठी आधी बक्षी टेकचंद आणि नंतर अय्यंगार कमिटी नियुक्त केली. या समितीने १९७० मध्ये पेटंटसाठी शिफारसी करताना उत्पादनासाठी पेटंट न देता प्रक्रियेसाठी पेटंट देण्याची तरतूद केली. जागतिक स्तरावरील कंपन्यांनी ही बाब हेरून गॅट कराराच्या माध्यमातून उत्पादनासाठी पेटंटची अट घातली. भारताने आपल्या पेटंट कायद्यात सुधारणा करताना तिसऱ्या कलमातील ड मध्ये पेटंट घेतलेल्या कोणत्याही औषधात बदल करून पुन्हा पेटंट घ्यायचे असेल रुग्णांना ते उपयुक्त ठरेल हे सप्रमाण सिद्ध करण्याची अट घातली. त्यामुळे एव्हरग्रीन पेटंटसाठी मखलाशी करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची अडचण होत आहे. याशिवाय महागडी औषधे उपलब्ध होत नसेल किंवा रुग्णांना ती योग्य प्रमाणात मिळत नसेल तर अन्य कंपन्यांकडून ही औषधे तयार करण्याची अट घातली.  स्वीत्झर्लंड आणि अन्य एका बहुराष्ट्रीय कंपनीला या नियमांचा फटका बसल्याने पेटंट नियमात बदल करण्यासाठी भारतावर दबाव असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. दत्तात्रेय भार्गवे यांच्या हस्ते बेळे यांचा सत्कार करण्यात आला.