शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

पेटंट कायद्यातील बदलासाठी भारतावर दबाव

By admin | Updated: July 17, 2017 00:18 IST

नाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर गदारोळ माजवत असून, वादग्रस्त तरतुदी काढण्यासाठी भारतावर दबाव वाढत आहे. या दबावाला बळी पडून लोकोपयोगी तरतुदी हटविल्यास भारतच नव्हे तर तिसऱ्या जगातील देशांसमोर औषधांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत बौद्धिक संपदातज्ज्ञ मृदुला बेळे यांनी व्यक्त केले.  दवप्रभा फिल्म अ‍ॅन्ड प्रॉडक्शनच्या वतीने झेप सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मृदुला बेळे यांनी तिसरे पुष्प ‘कथा औषध आणि पेटंटची’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पेटंटचा इतिहास आणि तो मंजूर करण्याची पद्धत या विषयावर सखोल विवेचन केले.स्वतंत्र भारताने पेटंट धोरणासाठी आधी बक्षी टेकचंद आणि नंतर अय्यंगार कमिटी नियुक्त केली. या समितीने १९७० मध्ये पेटंटसाठी शिफारसी करताना उत्पादनासाठी पेटंट न देता प्रक्रियेसाठी पेटंट देण्याची तरतूद केली. जागतिक स्तरावरील कंपन्यांनी ही बाब हेरून गॅट कराराच्या माध्यमातून उत्पादनासाठी पेटंटची अट घातली. भारताने आपल्या पेटंट कायद्यात सुधारणा करताना तिसऱ्या कलमातील ड मध्ये पेटंट घेतलेल्या कोणत्याही औषधात बदल करून पुन्हा पेटंट घ्यायचे असेल रुग्णांना ते उपयुक्त ठरेल हे सप्रमाण सिद्ध करण्याची अट घातली. त्यामुळे एव्हरग्रीन पेटंटसाठी मखलाशी करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची अडचण होत आहे. याशिवाय महागडी औषधे उपलब्ध होत नसेल किंवा रुग्णांना ती योग्य प्रमाणात मिळत नसेल तर अन्य कंपन्यांकडून ही औषधे तयार करण्याची अट घातली.  स्वीत्झर्लंड आणि अन्य एका बहुराष्ट्रीय कंपनीला या नियमांचा फटका बसल्याने पेटंट नियमात बदल करण्यासाठी भारतावर दबाव असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. दत्तात्रेय भार्गवे यांच्या हस्ते बेळे यांचा सत्कार करण्यात आला.