शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पेटंट कायद्यातील बदलासाठी भारतावर दबाव

By admin | Updated: July 17, 2017 00:18 IST

नाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेटंट कायदा करताना भारताने केलेल्या कायद्यातील काही तरतुदी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर गदारोळ माजवत असून, वादग्रस्त तरतुदी काढण्यासाठी भारतावर दबाव वाढत आहे. या दबावाला बळी पडून लोकोपयोगी तरतुदी हटविल्यास भारतच नव्हे तर तिसऱ्या जगातील देशांसमोर औषधांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत बौद्धिक संपदातज्ज्ञ मृदुला बेळे यांनी व्यक्त केले.  दवप्रभा फिल्म अ‍ॅन्ड प्रॉडक्शनच्या वतीने झेप सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मृदुला बेळे यांनी तिसरे पुष्प ‘कथा औषध आणि पेटंटची’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पेटंटचा इतिहास आणि तो मंजूर करण्याची पद्धत या विषयावर सखोल विवेचन केले.स्वतंत्र भारताने पेटंट धोरणासाठी आधी बक्षी टेकचंद आणि नंतर अय्यंगार कमिटी नियुक्त केली. या समितीने १९७० मध्ये पेटंटसाठी शिफारसी करताना उत्पादनासाठी पेटंट न देता प्रक्रियेसाठी पेटंट देण्याची तरतूद केली. जागतिक स्तरावरील कंपन्यांनी ही बाब हेरून गॅट कराराच्या माध्यमातून उत्पादनासाठी पेटंटची अट घातली. भारताने आपल्या पेटंट कायद्यात सुधारणा करताना तिसऱ्या कलमातील ड मध्ये पेटंट घेतलेल्या कोणत्याही औषधात बदल करून पुन्हा पेटंट घ्यायचे असेल रुग्णांना ते उपयुक्त ठरेल हे सप्रमाण सिद्ध करण्याची अट घातली. त्यामुळे एव्हरग्रीन पेटंटसाठी मखलाशी करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची अडचण होत आहे. याशिवाय महागडी औषधे उपलब्ध होत नसेल किंवा रुग्णांना ती योग्य प्रमाणात मिळत नसेल तर अन्य कंपन्यांकडून ही औषधे तयार करण्याची अट घातली.  स्वीत्झर्लंड आणि अन्य एका बहुराष्ट्रीय कंपनीला या नियमांचा फटका बसल्याने पेटंट नियमात बदल करण्यासाठी भारतावर दबाव असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. दत्तात्रेय भार्गवे यांच्या हस्ते बेळे यांचा सत्कार करण्यात आला.