शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

भारत कधीही सहिष्णू नव्हता

By admin | Updated: December 15, 2015 23:40 IST

रावसाहेब कसबे : प्रबोधन परिषद

सटाणा : भारत कधीही सहिष्णू नव्हता. या देशात असहिष्णुतेचे वातावरण हे वैदिक काळापासून चालत आलेले आहे. केवळ बौद्ध काळात असहिष्णुता आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र सहिष्णुता पूर्णपणे प्रस्थापित झाली नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. समाजप्रबोधन संस्थेतर्फे सोमवारी येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित तिसऱ्या एकदिवसीय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. या परिषेदेत कसबे यांना कवी यशवंत मनोहर यांच्या हस्ते ‘प्रबोधन मित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी कसबे यांनी नवोदित लेखकांना कोणत्याही व्यक्तीच्या आहारी न जाता स्वत:चे मत व्यक्त करण्याचा संदेश दिला. तसेच स्वत:चे आकलन, निष्कर्ष निर्भीडपणे मांडावे, पर्यावरण आणि त्याची गुंतागुंत जो चांगल्या पद्धतीने समजून घेईल त्यालाच उत्कृष्ट अशी साहित्य निर्मिती करता येईल असा कानमंत्रही त्यांनी नवख्या साहित्यिकांना दिला. समाजप्रबोधन परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी जगातल्या धर्मपीठांनी मानवतेच्या विकसनात हातभार लावण्याऐवजी मोठे विघटन केले असल्याचे परखड मत मांडले. तसेच नव्या जगाचा धर्म ही कविता असेल असा आशावाद व्यक्त करताना डॉ. मनोहर म्हणाले, कसबे हे आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या साहित्याने आणि विचाराने एका पिढीचे प्रबोधन केले असून, त्यांनी अत्यंत खडतर वाटेवर चालत लेखनप्रवास केल्याचेही मनोहर यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाटककार दत्ता पाटील, डॉ. मिलिंद कसबे, बी. जी. वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी कवी किशोर पाठक, महेंद्र मेश्राम, शं. क. कापडणीस, अंबादास घालगोत, प्रशांत गरुड, रंगराज ढेगले, आरती बोराडे, तुषार शिल्लक, प्रमोद अहिरे, संजय दोबाडे, मिलिंद बनसोडे, शैलेश चव्हाण, मेघा पाटील, कचरू भालेराव आदि उपस्थित होते. परिषद आयोजनासाठी दादा खरे, डॉ. सिद्धार्थ जगताप, चंद्रकांत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)