शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या गावांना स्वतंत्र फिडरचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:00 IST

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात साठणा-या पाण्यातून नगर, मराठवाडा, जळगाव, मुंबई या भागाची तहान भागविली जाते. साधारणत: जानेवारी महिन्यापासून धरणाच्या पाण्याचे केलेले आरक्षण टप्प्याटप्प्याने कॅनॉल, नदी मार्गाने सोडण्यात येते. जानेवारी महिन्यापासूनच ख-या अर्थाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही

ठळक मुद्देअवास्तव खर्च : निधी उपलब्धतेबाबत शासन उदासीनपिण्याचे पाणी व जनावरांसाठीदेखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील धरणामधून नगर, मराठवाड्यासाठी पाणी सोडताना गोदाकाठच्या गावांना भोगाव्या लागणाऱ्या खंडित विजेची शिक्षा टाळण्यासाठी गोदाकाठच्या सर्वच गावांमध्ये विजेचे स्वतंत्र फिडर बसविण्याचा प्रस्ताव निधीअभावी बासनात गेला असून, वीज कंपनीने याकामी येणारा अवाढव्य खर्च सोसण्यास नकार दिला तर राज्य शासनानेही सदरच खर्च उचलण्यास असमर्थता व्यक्त केल्याने गोदाकाठच्या ग्रामस्थांच्या नशिबी काळोखाचे साम्राज्य कायम आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात साठणा-या पाण्यातून नगर, मराठवाडा, जळगाव, मुंबई या भागाची तहान भागविली जाते. साधारणत: जानेवारी महिन्यापासून धरणाच्या पाण्याचे केलेले आरक्षण टप्प्याटप्प्याने कॅनॉल, नदी मार्गाने सोडण्यात येते. जानेवारी महिन्यापासूनच ख-या अर्थाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याची गरज असते, परंतु पाण्यावर आरक्षण अन्य भागाचे असल्यामुळे त्यांना डोळ्यासमोर दिसणारे पाणी घेण्यास अडचणी निर्माण होतात. विशेष करून गोदावरी डावा, उजवा कालवा, नाशिक, निफाड या दोन तालुक्यांतून वाहणारी गोदावरी नदीलगतच्या गावांमध्ये आवर्तनाच्या काळात अनेक बंधने लादली जातात. दरवर्षी कालव्यामार्गे पाणी सोडताना पाटबंधारे खात्याला कालव्यातील डोंगळे काढण्याचे अवघड काम करावे लागते. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने शेतकºयांनी कालव्याला तळाशी डोंगळे टाकून त्याद्वारे शेतात, विहिरीत पाणी टाकण्याची सोय केल्याचेही या निमित्ताने उघड होते. शासकीय भाषेत याला पाणीचोरी असे संबोधले जात असल्याने ते रोखण्यासाठी डोंगळे काढणे, पंप, मोटारी जप्त करणे, कालवा, नदीकाठी पोलीस पहारा तैनात करण्याबरोबरच, अलीकडच्या काळात आवर्तनाच्या दिवसात गोदाकाठच्या गावांमध्ये वीजबंदी लागू केली जात आहे. प्रशासनाकडून तसे आदेश वीज कंपनीला दिले जात असले तरी, त्यासाठी काही ठराविक काळासाठी शेतकºयांना सूट देण्याची तरतूद आहे. परंतु प्रशासनाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून गोदाकाठच्या गावांमध्ये सरसकट चोवीस तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांच्या शेतातील विहिरीत पाणी आहे, त्यांना निव्वळ विजेअभावी स्वत:चे पाणी घेता येत नाही, पिण्याचे पाणी व जनावरांसाठीदेखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने दरवर्षी गोदाकाठच्या शेतक-यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून गोदाकाठच्या गावांना विजेचा स्वतंत्र फिडर बसविण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. त्यावर वीज कंपनीकडून अभ्यास करण्यात येऊन खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले गेले. परंतु अवघ्या दोन किलोमीटरसाठी सादर करण्यात आलेला प्रस्तावात वीज कंपनीने कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविला. सदर कामाचा खर्च राज्य सरकार व वीज कंपनीने निम्मा निम्मा उचलावा असा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावाही केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. मध्यंतरी जिल्हा नियोजन विकास समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले. परंतु त्यासाठी येणारा खर्च पाहता, हा प्रस्तावही बारगळा आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक